मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत सापडले असून, आत्तापर्यंत या प्रश्नावरून सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी देखील ठाकरे सरकारसमोर मांडलेल्या ५ मागण्यांसाठी, सरकारला ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
तसेच, दुसरीकडे राज्य सरकारवर विरोधकांकडूनदेखील दबाव आणला जात असून, आज भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी आज प्रसार माध्यमांसमोर, मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका करताना, “आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांचाच मराठा आरक्षणाला विरोध होता. त्यामुळेच हे आरक्षण गेले,” असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
तसेच, आम्ही सर्व तांत्रिक बाबी तपासून समाजाला आरक्षण दिले, ते उच्च न्यायालयातही टिकले. मात्र, आमचे सरकार गेले आणि हे सरकार आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे मांडू शकले नाही. त्यामुळे आरक्षण जाण्याला हे सरकार जबाबदार आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
यावेळी, “हे तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे, त्यांच्यातच आरक्षणावरुन वाद-विवाद, मतभिन्नता आहे. यांच्यातलेच अर्धे मंत्री या आरक्षणाच्या विरोधात आहेत. दरम्यान, आता यावर नुसती चर्चा होत असून, राजे छत्रपती संभाजी भोसले हे आमच्याच पक्षाचे आहेत, त्यामुळे ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात येत्या ७ जूनला काय भूमिका मांडतात, ते पाहू,” असे देखील मत देखील त्यांनी मांडले आहे.
Read Also :
- ‘राज्याच्या राजकारणात आता शिळेपणा आलाय; संभाजीराजेंनी पुढाकार घेऊन तो दूर करावा’
- ‘माझ्यावरील आरोप सूडबुद्धीने; आघाडी सरकारला हा बदनाम करण्याचा प्रयत्न’
- पावसाळ्यात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता, काळजी घ्या! – मुख्यमंत्री
- ‘हा आमच्या नाही, फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाचा परिणाम!’
- ठाकरे सरकारच्या नाकार्तेपणामुळे OBC समाजावर पुन्हा अन्याय – देवेंद्र फडणवीस