नागपुर : ज्या पद्धतीने भाजपने शिवसेना तोडण्याची योजना आखली होती. त्याप्रमाणे त्यांची योजना आता सफल झाली आहे. दुसऱ्यांचा घर तोड हा भाजपचा धंदा होता. तसेच ज्या पद्धतीने शिवसेनेच्या निवडणुक चिन्हाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाकडे पाठविला. ते फार महत्वाच ठरलं आहे. त्यामुळे आता निवडणुक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा. अशी प्रतिक्रिया काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवावरील वक्तव्याचे पुण्यातही पडसाद
मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयातील वकिला माध्यमांसमोर आले आणि आम्हाला वाचवा. असं म्हणण्याची वेळ नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळात येत असेल तर याचा विचार देशातील जनतेला आता करावं लागणार आहे. त्याचबरोबर भाजपला पहिल्यांदाच 105 आमदार लोकांनी निवडून दिले आहेत. सुरूवातीला ते 50 च्या आत राहत होते. तसेच ते पहिल्यापासून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. सत्ता मिळवण्यानंतर सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि त्यातून भय, आणि भूक या तीन गोष्टी देण्याचा संकल्प भाजपने केला आहे. त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं असून लोकांचा कल हा भाजपच्या विरोधात आपल्याला बघायला मिळत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“लोक निवडून आलीत धनुष्यबाणावर अन् 50 खोके एकदम ओक्के”; अजित पवारांची टोलेबाजी
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात विरोधी पक्ष सातत्याने टिका करीत आहे. त्यातच काॅंग्रेसचे नेते शिंदे सरकारवर कडाडून टिका करताना भाजपवर देखील निशाणा साधत आहे.
Read also
- “दहा कोटी रूपये कुठून आले? शिंदेसाहेब, हा महाराष्ट्र आहे;” अजित पवारांचा इशारा
- “या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री..;” मोहन भागवतांच्या वक्तव्यांनंतर पाटलांची प्रतिक्रिया
- “धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणुक आयोगाच्या हाती..!” शरद पवारांचं सुचक वक्तव्य
- नाशिक बस अपघात…! अपघातातील नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री
- “..तरी पाटील हिंदू धर्माच्या विपरीत कसे काय बोलले?” अंधारेंचा सवाल