कोल्हापूर : दसरा निमित्ताने बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला कोट्यावधी रूपयाचा खर्च झाला आहे. लोकांची गर्दी जमवण्यासाठी जवळपास 1700 बसेस बुक करण्यासाठी 10 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. यासंदर्भात एका व्यक्तीनी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील केली आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.
“लोक निवडून आलीत धनुष्यबाणावर अन् 50 खोके एकदम ओक्के”; अजित पवारांची टोलेबाजी
एकनाथ शिंदे म्हणत होते की, लोक स्वत: हून आले. मग भाषणावेळी उठून का जाते होते, अशी विचारण करत, सभेला कोट्यावधीचा खर्च केला. ते दहा कोटी कुठून आले? असा सवाल अजित पवारांनी केला. तसेच शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे, असे इथे चालणार नाही. असा इशाराही दिला. त्याचबरोबर शिंदे यांच्या भाषणाला लोकांमधून समोरून प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला समोरून प्रतिसाद मिळत होता. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली.
“..म्हणून मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्व, गदर, उठाव अशा थापा मारणं बंद कराव”
शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत असताना नुसतं सर्वसामान्यांचं सरकार सांगून चालत नाही, तर या सर्व लोकांना आपलं सरकार वाटायलं हव. बेरोजगारी वाढवणारं सरकार आहे. मोठे मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्याला पाठवणारं सरकार आहे. शेतकऱ्यांना वेळेवर मदत झाली नाही. पाऊस अजूनही सुरू असल्याकारणाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालं. परंतु या संदर्भात ते बोलायला तयार नाहीत. असं देखील अजित पवारांनी म्हटलं.
“चंद्रकांतदादा, तुमच्या नेत्यांचा आदर सर्वांनाच आहे, पण..”; रोहित पवार
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर त्यांच्यावर 50 कोटी रूपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख नेहमी 50 खोके, गद्दार म्हणून केला. त्याचबरोबर विरोधी पक्षांनी देखील पन्नास खोक्के म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात बंडखोर आमदारांवर पन्नास खोक्के एकदम ओक्के म्हणून म्हण प्रचलित झाली.
Read also
- “या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री..;” मोहन भागवतांच्या वक्तव्यांनंतर पाटलांची प्रतिक्रिया
- “धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणुक आयोगाच्या हाती..!” शरद पवारांचं सुचक वक्तव्य
- नाशिक बस अपघात…! अपघातातील नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री
- “..तरी पाटील हिंदू धर्माच्या विपरीत कसे काय बोलले?” अंधारेंचा सवाल
- उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवावरील वक्तव्याचे पुण्यातही पडसाद