मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येवर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी तुमचे कुटुंब मरणाच्या दारी… विश्वातील बेस्ट मुख्यमंत्र्यांनी घरी बसून “करून” दाखवल , अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्रात मृत्यूची आकडेवारी जास्त असल्याचे आढळून आले आहे. यावर ‘राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची सरासरी आंध्रप्रदेश व तामिळनाडूपेक्षाही जास्त…माझे कुटुंब माझी जबाबदारी तुमचे कुटुंब मरणाच्या दारी…विश्वातील बेस्ट मुख्यमंत्र्यांनी घरी बसून “करून” दाखवलं;, अशा शब्दांत भातखळकर यांनी टीका केली.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी’मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी सरकारची एक टीम जाईल. मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘ब्लॅक बेल्ट’ म्हणून करावा. सदा सर्वदा मास्क लावावा. शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना फेस टू फेस बोलणं टाळण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत