अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती.
मात्र यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत. विरोधी पक्षातील भाजपने आता सत्ताधारी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी करणाऱ्या वरिष्ठ पोलिसांना निलंबित करावे आणि गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
काय म्हणालेत भातखळकर नेमकं
सुशांत सिंह केस सीबीआयकडे सोपवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद.
आता कडक ताशेऱ्यानंतर तरी गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा.
मुंबईच्या पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करून त्यांच्या सह संबंधित पोलिसांची CBI चौकशी करावी.
पोलीस प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव होता याची ही चौकशी व्हावी.
तसेच भाजप नेते किरीट सोमय्या त्यांनी देखील गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावी अशी मागणी करत महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.
अब न्याय होगा
सुप्रीम कोर्ट का धन्यवाद। सुशांत केस में कोर्ट की कठोर टिप्पणी के बाद राज्य के गृहमंत्रीने पदत्याग करना चाहीये। मुंबई के पुलिस कमिशनर, अन्य जाच अधिकारि और इस केस में दबाव डालने वाला मंत्री कौन है इस की भी CBI जांच हो। pic.twitter.com/ORH00Ihy4j— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 19, 2020