“राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. बिहारच्या राजकारणाचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत पाटलांनी कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचं उदाहरण दिलं असलं, तरी सध्या भक्कम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं
सरकार पाडणार नसून मजबूत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. मात्र, चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर फडणवीसांनी याबाबत सारवासारव केली