नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक महिना झाला आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे या शेतकऱ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून राहुल गांधींचा कृषी कायद्यासंदर्भात भूमिका मांडणारा जूना व्हिडीओ शेअर करत निशाणा साधण्यात आला आहे.
ये क्या जादू हो रहा है राहुल जी?
पहले आप जिस चीज़ की वकालत कर रहे थे, अब उसका ही विरोध कर रहे है।
देश हित, किसान हित से आपका कुछ
लेना-देना नही है।आपको सिर्फ़ राजनीति करनी है।लेकिन आपका दुर्भाग्य है कि अब आपका पाखंड नही चलेगा। देश की जनता और किसान आपका दोहरा चरित्र जान चुके है। pic.twitter.com/Uu2mDfBuIT— Jagat Prakash Nadda (@JPNadda) December 27, 2020
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत नड्डा यांनी लिहिले की, ही काय जादू सुरू आहे ? अगोदर आपण ज्यांची वकिली करत होतात, आता त्यांचा विरोध का? देशहित आणि शेतकरी हिताशी आपलं काहीही देणघेणं नाही. आपणास केवळ राजकारण करायचंय, पण आता आपलं काहीही चालणार नाही. देशातील शेतकरी आणि जनता आपले दुटप्पी व्यक्तीमत्व जाणून आहेत, असे म्हणत त्यांनी गांधींवर निशाणा साधला.
या व्हिडीओमध्ये राहुल गांधी अमेठीतल्या बटाटा उत्पादक शेतकऱ्याचं उदाहरण देत त्यांना आपला माल थेट कंपन्यांना विकता आला पाहिजे, दलालांचं वर्चस्व संपलं पाहिजे, अशी भूमिका मांडताना दिसत आहेत.