मुंबई : राज्यात जे काही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केलं जात आहे. ते चुकून घडत नाही तर हा भाजपचा अजेंडा आहे. शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचा त्यांचा हा एकमेव कार्यक्रम आहे. सुरूवातीला कोश्यारी, त्यानंतर त्रिवेदी अन् आता मंगल प्रभात लोढा यांनी वक्तव्य केले आहे. त्यामुळे हे चुकून घडत नसून भाजपचा पुर्वनियोजित शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्लॅन असल्याची टिका कोल्हापुरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी भाजपवर केली आहे.
वाचाळवीर थांबता थांबेना..! आता शिंदे गटातील आमदारांनी महाराजांच्या गिनीमी काव्याची केली तुलना
जे काही नेते शिवाजी महाराजांना बदनाम करत आहेत. त्यांच्यावर आम्ही गुन्हा देखील दाखल करणार आहोत. या नेत्यांबाबत वरिष्ठांनी त्यांना थांबण्यास सांगावे, अन्यथा जर महाराष्ट्रात शिवसैनिकांचा उद्रेक झाला तर महाराष्ट्रात खुप वाईट घडेल. तसेच या महाराष्ट्रात आम्ही शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला नाही, अन् करणारही नाही. असा इशाराही संजय पवार यांनी दिला आहे.
वाचाळवीर थांबता थांबेना..! आता शिंदे गटातील आमदारांनी महाराजांच्या गिनीमी काव्याची केली तुलना
सातत्याने छत्रपतींवर टिका केली जात आहे. हे पंतप्रधानांनी येथील नेत्यांना सांगितलं पाहिजे होतं. काल लोढांनाही त्यांनी समज दिली पाहिजे होती. शिवाजी महाराजांचा अपमान करणे हा भाजपचाच अजेंडा असल्याने यातून दिसून येत आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही आगपाखड केली. मुख्यमंत्र्यांनी वरती कळवलं असेल तर त्यांनी पत्रकार परिषदे घेऊन पत्र दाखवलं पाहिजे. परंतु त्यांची भूमिकाच संशयस्पद वाटत आहे. असंही ते म्हणाले.
मोठी बातमी..! नागपुर येथील आरएसएसचं मुख्य कार्यालय उडवून देण्याची धमकी
दरम्यान, प्रतापगडावर 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं. पण स्वराज्यसाठी ते बाहेर पडले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं. पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले. मंगल प्रभात लोढा यांच्या या वक्तव्याने आता राज्यात याचे पडसाद उमटायला सुरूवात झाले आहेत.
Read also
- #GujratElection2022 हाच का गुजरात पॅटर्न…! 290 कोटी कॅश, 500 कोटीचे अंमली पदार्थ, 15 कोटींची दारू ताब्यात
- “मंगल प्रभात लोढांनी दिलगिरी व्यक्त केली, विषय संपला”; सुप्रिया सुळे
- “संजय राऊतांनी राजकारण करावं, पण त्यात देवाला ओढू नये”; नवनीत राणा
- “राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जाती-पातीचं राजकारण”; राज ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल
- “गुवाहाटीत शिंदे गटातील आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रूपये देण्यात आले ;” माजी खासदाराचा दावा