मुंबई : भाजपा एक राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना मुंबईत, मुंबईच्या उद्योगांमध्ये, आर्थिक उलाढाली, जमिनींमध्ये रस असल्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत रस आहे. हे गेले पन्नास वर्षे सुरू आहे. त्यांना मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणं करायचं आहे. आम्ही ते होऊ देत नाही. त्यांना मुंबई विकायची आहे, घशात घालायची आहे. मुंबई ओरबाडण्याला आमचा विरोध आहे. कोणाच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी मुंबई महानगरपालिकेवर आज जो भगवा फडतोय त्याला हात लावण्याची, तो खाली उतरवण्याचीही हिंमत करणाऱ्यांचे हाच जळून खाक होतील,” असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं.
त्या भगव्यामध्ये लाखो, कोट्यवधी लोकांचा त्याग, रक्त सांडलं आहे, असं राऊत म्हणाले. फडणवीस हे विरोधीपक्ष नेते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधानं करू शकतात. जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही, असं भाजपाला वाटत असेल आणि जे कोणी भगवा फडकवणार आहेत तो शुद्ध आहे हे जनताच ठरवेल.
आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा असून गेली ५० वर्षे तो मुंबई महानगरपालिकेवर फडकत आहे, असंही ते म्हणाले. भाजपा मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईला वेगळं करण्याचं भाजपाचं राजकारण आहे. कोणी नटी मुंबईला पीओके म्हणाली, मुंबई पोलिसांना माफीया म्हणाली. ती भाजपाची कार्यकर्ती आहे. तिच्या समर्थनार्थ असणाऱ्यांना मुंबई देणार का असा सवालही राऊतांनी केला.
राजकारणात सर्वांकडूनच इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे प्रत्येक भाषणात इशारे देत असतात. एखादी गोष्ट चुकीची होत असल्यास इशारा दिला जातो. तुमच्या पक्षाचे नेते राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खोटेनाटे आरोप करत असतील आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार.ही लोकशाहीतील महत्त्वाची भूमिका आहे, असं राऊत म्हणाले.
Read Also ;
फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “
‘लातों के भूत बातों से नहीं मानते” म्हणत मनसेचा आंदोलनाचा इशारा