पिंपरी चिंचवड : येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकच्या रणधुमाळीशी दोन हात करण्यासाठी राजकीय नेते तयारीला लागले आहेत. त्यातच एकीकडे आपला बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पार्थ पवार बारकाईने लक्ष घालत असतानाच दुसरीकडे भाजपची सत्ता कायम राखण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या राजकाराणातील सक्रीय असलेली राम – लक्ष्मणाची जोडी देखिल सज्ज झाली आहे. विशेषत: म्हणजे गेली १५ वर्षे सत्ता उपभोगली असताना भाजपच्या सक्रीय नेत्यांच्या तुलनेत पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा प्रभाव अत्यंत अल्प प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे आपला बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी महापालिका निवडणुकीत अजित पवार येवू देत किंवा पार्थ पवार येवू देत आम्ही त्यांच्या विरोधात लढण्यात घाबरत नाहीत, अशी खणखणीत प्रतिक्रिया आमदार लक्ष्मण जगताप यांनी दोन दिवसांपुर्वी सरकारनामाला दिलेल्या मुलाखतील दिली आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप नव्हे तर अजित पवार, पार्थ पवार विरुद्ध भाजप अशी लढत होईल, असेही आमदार जगताप यांनी सांगितले आहे.
हे पण वाचा, पिंपरी चिंचवड प्राधिकरण विलिनीकरण: अजित पवारांच्या विरोधात राम-लक्ष्मणाची जोडी एकवटली
पिंपरी चिंचवड महापालिकेवर सलग १५ वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे, पिंपरी महापालिका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात असे. परंतू, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला तडे गेले. त्यानंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता खेचून आणली. त्यामुळे, बालेकिल्ला म्हणून चर्चिल्या गेल्याला राष्ट्रवादीचा अवघा बुरुंज ढासळला. गेल्या १५ वर्षापासून सत्ता उपभोगत असताना क्षणांर्धात परिवर्तन झाल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संग्रभ निर्माण झाला. शिवाय, कारभारी म्हणून पाहिल्या जाणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार २०१७ च्या पराभवानंतर अनेक दिवस शहरात फिरकले सुद्धा नाही. आणि याचाच फायदा घेत भाजपचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी पक्ष सक्रीय करण्याबरोबरच पिंपरी चिंचवडच्या विकासा कामांचा तगादा लागला.
हे पण वाचा, ‘प्राधिकरण विलिनीकरणाच्या अन्यायकारक निर्णयामुळे पिंपरी चिंचवडकरांचे भरुन न काढण्यासारखे नुकसान’
गेली १५ वर्षे सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड शहराला एक नवी ओळख निर्माण करून दिली. रस्त्यांचे रुंदीकरण, नालेसफाई, घरकुल योजना यांसारख्या विकास कामांना प्राधान्य देवून राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही पिंपरी चिंचवडकरांनी २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला का नाकारले?, असा प्रश्न स्थानिक नेत्यांना पडू लागला. परंतू, विकास कामे करत असतानाच किंवा सत्ता उपभोगत असताना राष्ट्रवादी पक्षाने अनेक चुका केल्या. ज्या पिंपरी चिंचवडकरांच्या मनाविरुद्ध होत्या. परंतू, १५ वर्षे एकहाती सत्ता असल्याने राष्ट्रवादीला आपल्या चुका निदर्शनास आल्या नाही. सत्तेची सवय आणि पिंपरी चिंचवडकरांची साथ यामुळे कोणतीही चुक न करता आपण योग्य दिशेने जात आहोत, असा भ्रम राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना होऊ लागला. याचाच फटका म्हणावा तो २०१७ च्या निवडणुकीत बसला, असेही आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.
हे पण वाचा, इंद्रायणीनगरमधील पाण्याच्या टाकीचे काम उपमुख्यमंत्री अजितदादांमुळेच रखडले!
२०१७ साली एकूण १२८ जागांपैकी भाजपचे ७७ नगरसेवक निवडूण आले. त्यामुळे, विरोधकांनी गेल्या तीस वर्षात केले नाही, ते आम्ही पाच वर्षात करून दाखवू, अशी ठाम भूमिका घेतलेल्या पिंपरी महापालिकेचे कारभारी तथा भाजपचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी विकास कामांसाठी कंबर कसली. शहरातील विविध विकासकांना गती देवून स्मार्ट सिटीप्रकल्पाच्या टॉप १०० मध्ये पिंपरी चिंचवड शहराला समाविष्ट करण्याच मानस मिळविला. त्यामुळे, २०२२ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप मुसंडी मारणार. कारण, गतवेळपेक्षा (२०१७) यावेळी म्हणजे २०२२ ला पालिकेत जास्त जागा मिळवू, असा विश्वास भाजपच्या कारभारी जोडीने व्यक्त केला आहे. कारण, पूर्वीसारखे गावकीभावकीचे राजकारण तेवढ्या प्रमाणात शहरात राहिले नसल्याने गाववाल्यांखेरीज काही नवे चेहरे २०२२ च्या पालिका सभागृहात दिसणार असल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले.
हे पण वाचा, महेश लांडगेंनी पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणसाठी पुन्हा घेतला पुढाकार, मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
२०१७ ला नाकारल्याने २०२२ मध्ये पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी पार्थ पवार आणि अजित पवार लक्ष घालीत आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात या दोन नेत्यांचा प्रभाव पडणे साहाजिक आहे. पण असे कितीही अजित पवार आणि पार्थ पवार आले तरी आम्ही घाबरत नाही, येत्या निवडणुकीत भाजपची सत्ता कायम राहिल. कारण अजित पवारांनी प्राधिकरण विलिनिकरणाचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा शहरवासीयांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे, २०२२ ची निवडणुक झाल्यास भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे विरुद्ध राष्ट्रवादी नव्हे तर अजित पवार व पार्थ पवार विरुद्ध भाजप अशी लढण्यास आमच्यासह स्थानिक भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. यामध्ये भाजपचा विजयच होणार आहे, कारण गेल्या १५ वर्षात झालेल्या चुका आणि प्राधिकरणाचा चुकीचा निर्णयामुळे बळी पडेल, एवढे पिंपरी चिंचवडकर नक्कीच नालायक नाहीत?, हे पवारांना कळने महत्वाचे, असेही आमदार जगताप यांनी सांगितले.