पाटणा : सात महिन्यांनंतर होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक होणार आहेत. मात्र त्याआधीच भाजपमध्ये एका मोठ्या बंडाची तयारी होत आहे. विद्यमान १२६ आमदार भाजपशी फारकत घेऊन दुसऱ्या पक्षात सामील होण्याच्या बेतात आहेत, असा गौप्यस्फोट योगी आदित्यनाथ सरकारच्या एका मंत्र्याने वृत्त वाहिनीशी बोलताना केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप संपुष्टात येणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
योगी आदित्यानाथ सरकारमध्ये मंत्री आणि आमदारांचे काहीही ऐकून घेतले जात नाही. तसेच त्यांना महत्त्वही दिले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणांवर नाराजी आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामार्फत राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी अन्य सदस्यांसोबत योगी आदित्यनाथ सरकारच्या स्थितीचे आकलन केल्यानंतर दावा केला होता की, सर्व काही ठीक आहे. नेतृत्वात बदल होणार नाही. कारण आम्ही मंत्री आणि आमदारांशी चर्चा केलेली आहे, असे त्यांनी सांगितले होते.
परंतू, मंत्री बृजेश पाठक यांनी सांगितले की, बी. एल. संतोष आणि अन्य केंद्रीय नेत्यांनी लखनौत बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. आमदारांशी थेट संवाद साधण्यात आला नाही. या बैठकीत फक्त कोरोना स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवरच चर्चा झाली. भाजपचे आ. राकेश राठोड यांनी सरकारविरुद्ध याआधीच बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. त्यांचा आरोप आहे की, सरकारच्या लेखी आमदारांना महत्त्वच नाही. कोणी बोलले, तर कायद्याचा बडगा उगारून त्याची बोलती बंद केली जाते. त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन बघता ते भाजपविरुद्ध बंड करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे संकेत मिळतात. फिरोजाबादचे आ. राम गोपाल लोधी यांच्यासह दुसरे आमदारही भाजपविरोधी भूमिका घेत निवडणुकीआधी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत दिसतात. त्यामुळे भाजपला आता मोठा सुरूग लागण्याची शक्यता आहे.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे – देवेंद्र फडवणीस
- सोनियाजी, तुमचे मंत्री काका-पुतण्यापुढे लाचार झालेतं – गोपीचंद पडळकर
- भाजपला मोठा हादरा बसणार?; ३३ आमदार करणार भाजपातून पक्षांतर
- ‘वडेट्टीवारसाहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकत’
- ‘घरीच थांबा, शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’