नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून, चव्हाणांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान आहे. केंद्र सरकार मराठा आरक्षणात हस्तक्षेप करू शकत नाही.’ ते दिल्लीत बोलत होते.
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावर बोलतान पाटील म्हणाले की, औरंगाबादचं संभाजी नगर नाव करावे, यासाठी आमचा संघर्ष कायम राहील. सरकारने तसा प्रस्ताव आम्हाला दिल्यास आम्ही नाव बदलू.
दरम्यान, याआधी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केले होते. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणाला संविधानिक संरक्षण देण्यासाठी केंद्रानं प्रयत्न करावेत, असे त्यांनी म्हटले होते.
Read Also :
- ‘बाळासाहेब म्हणायचे आम्ही औरंग्याची नाही, संभाजी महाराजांची औलाद आहोत’
- ‘त्या’ घटनेबाबत रामदास आठवले थेट ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा करणार
- लस घेतलेल्यांची अशी पटणार ओळख, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
- 2024 पर्यंत लढा देण्याची आमची तयारी, शेतकरी आंदोलकांचा इशारा
- शरद पवारांनी डिलीट केले महेश कोठेंच्या प्रवेशाचे ट्विट, पण का ?
- …म्हणून काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतराला विरोध आहे, थोरातांनी सांगितले कारण