नवी दिल्ली : ‘कृषी सुधार विधेयकास विरोध दर्शविताना विरोधी पक्षातील लोक इतके चिडले होते की, जर तिथे मार्शल हजर नसते तर ‘राज्यसभेच्या उपसभापतींची हत्या देखील झाली असती’ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे.
कृषी विधायक मंजूर होताना विरोधकांनो राज्यसभेचेउपसभापती हरिवंश यांच्यासमोर केलेल्या गैरवर्तनांवरून मंत्री गिरीराज सिंह यांनी भाष्य केले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, ‘रविवारी केवळ बिहारच्या मुलावरच हल्ला झाला नाही तर हा हल्ला लोकशाही आणि त्याच्या घटनात्मक संरचनेवर करण्यात आला.’ ज्या नियमांनुसार ते निवडून संसदेत पोहोचले आहेत त्याच नियम त्यांनी पायदळी तुडवले. जर तिथे मार्शल नसते तर त्यांनी हरिवंशजी यांची हत्या केली असती. त्यांचा जीवही गेला असता.’
हरिवंशजी हे फक्त बिहारचेच नाही तर ते लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी देखील आहेत. त्यांनी चंद्रशेखरजी यांच्याबरोबर काम केले आहे. ते पत्रकार देखील होते. ते जेव्हा राज्यसभेत निवडून आले तेव्हा त्यांना उपसभापती म्हणून नियुक्त करण्यात आले. ते संयम आणि घटनात्मक संरचनेचे प्रतीक आहेत. जर विरोधकांनी दिलगिरी व्यक्त केली नाही तर बिहार याचा नक्कीच सूड उगवेल.’ दरम्यान, राज्यसभेत गदरोळ खासदारांना गिरीराज सिंह यांनी ‘अर्बन नक्षलवादी’ असं म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
Read Also :
…आणि मनसे नेते संदीप देशपांडे जामिनावर सुटले
शरद पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराने देखील केला अन्नत्याग