मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वबळाचा नारा आणि उलटसुलट वक्तव्यांमुळे गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा आहे. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावरच अग्रलेख लिहून नानांचा स्वभाव किती मोकळ्या-ढाकळ्या मनाचा आहे हे सांगताना भाजपमधल्या चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे जसं मनास येईल ते बोलतात तसंच नानांचंही आहे. नाना विदर्भाच्या मातीतील रांगडे गडी आहेत, असं राऊत म्हणाले. तर हे वर्णन करताना राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना कोपरखळी लगावली आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक, असा टोमणा राऊतांनी मारलाय.
हे पण वाचा: ‘जरंडेश्वर’प्रकरणी अमित शहांकडे तक्रार करणार, अजित पवार असणार टार्गेट?
हे पण वाचा: झोटिंग समिती फास होता, खडसेंना केवळ त्रास होता, फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री होते
नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पाटील हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे महाराष्ट्राला जितके कौतुक तितकेच कौतुक नानांच्या रांगड्या बोलीचे आहे, अशी तुलना संजय राऊत यांनी केलीय. पण ती करत असताना राऊतांनी चंद्रकांतदादांना चिमटे काढण्याची संधी मात्र सोडली नाही.
हे पण वाचा: नाना पटोले काय बोलतात, कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य; सामना मधून पटोलेंचं कौतुक आणि कानपिचक्याही
जसे भाजपात दानवे तसे काँग्रेसमध्ये नाना…!
नाना पटोले हे मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना…. नाना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून सतत चर्चेत आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. नाना त्यांची मन की बात व्यक्त करतात. सध्याचा अतिजागरूक मीडिया त्यांच्या मन की बातची बातमी करून मोकळा होतो.
हे पण वाचा: पंकजा मुंडे नाराज नाहीत, राजीनामे न देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन – चंद्रशेखर बावनकुळे
काँग्रेस अनेक राज्यांमध्ये मृतपाय, नानांकडे संजीवनी गुटिका आहे का?
अग्रलेखात नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याविषयी शिवसेनेने खास शैलीत टोलेबाजी केली आहे. “महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची आणि स्वबळावर काँग्रेसला सत्तेत आणायचं असा विडाच नानांनी उचलला आहे. त्यांच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल. नानांकडे संजीवनी गुटिका किंवा विद्या आहे व त्यामुळे ते काँग्रेसला जागं करुन पुढे नेणार आहेत का? या संजीवनी गुटिकेची माहिती त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिली आहे का? अनेक राज्यांत काँग्रेस मृतप्राय होऊन बसली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात जाऊन नानांना ही संजीवनी गुटिका द्यावीच लागेल.”