दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील 40 आमदाराच्या बंडानंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात सामील होणार असल्याचं बोलले जात आहे. काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीला शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित होते. यामुळे शिवसेनेला धक्का बसणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. यावरून आता ज्या व्यक्तीमुळे आपण घडलोत, ज्या बाळासाहेबांमुळे आपण नावारूपाला आलोत त्यांचा पक्ष आज संकटात असताना आणि त्या पक्षाच्या वटवृक्षावर घाव घालण्याचं पाप आपण करू नये असं शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी बंडखोरांना सुनावलं आहे.
“पुर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत”
मी मुळ झेंडा हातात घेतलेला असून हिंदुत्ववादी विचारसरणीचा माणुस आहे. 1986 पासुन शिवसेनेसोबत आहे. ज्या पक्षाने मला संसदेच्या सर्वोच्च पदापर्यंत जाण्याची संधी दिली. ज्या मतदारांनी मला तिथपर्यंत पाठवलं त्यांची प्रतारणा करणे माझ्या रक्तात नाही. कोणाला काय भुमिका घ्यायची, त्याचं त्यानी ठरवावं. परभणीने शिवसेनेला धनुष्यबान दिला आहे. परभणीकर शिवसेनेसोबत होते, आहेत आणि राहतील, असंही परभणीचे खासदार संजय जाधव म्हणाले.
“आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो”; शिंदे गटात उपनेतेपदी निवड झाल्यानंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया
मी मांडलेल्या समस्यांना जे उद्धव ठाकरे यांच्याकडुन अपेक्षीत होत ते मला मिळालं. राष्ट्रवादीकडुनच नाही तर भाजपसोबत असतानाही आम्हाला त्रास झाला. तेव्हा आम्ही त्यांना सोडुन गेलो का ? पक्षाचा नेता म्हणुन काम करतो. तेव्हा तो सर्वाना खुश ठेवु शकत नाही. प्रत्येक घरातही असे मतभेद होत असतात आणि हा तर राजकीय पक्ष आहे. एवढा गाडा हाकायचा म्हटल्यावर थोडं फार कमी जास्त तर होणारच, हे सहन करायची मानसिकता प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असंही खासदार संजय जाधव म्हणाले आहेत.
हाकालपट्टी केलेल्या नेत्यांना विविध पदांची लॉटरी ; शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
दरम्यान, राज्यात एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना सुरूंग लावण्याचे काम केले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे गटालाच धक्का दिला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारण एका वेगळ्याच मार्गावर चालेलं आहे. तसेच राज्यात सध्या फोडाफोडीचं राजकारण घडताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील सामान्य नागरिक या सर्व घटनांना वैतागून गेली आहे.
Read also
- “शिंदे-ठाकरे वादात भाजपची चांदी”; शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर
- “शिवसेना आज पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही”; रामदास कदम
- “बहुतेक सय्यद बंडा अन् विश्वप्रवक्ते हे दोघेच नवाब यांच्या बरोबर राहतील”
- “मुखर्जी, वाजपेयींबद्दल बोलता अन् दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचं पाप करता”
- आधी रड रड रडले, नंतर दिला थेट इशारा; “आमच्यामुळे खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये”