नाशिक : महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांच्या विरोधात थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करा: काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा वाद उफाळल्याचं दिसून येत आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांची भुजबळांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आमदार सुहास कांदे यांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुहास कांदे यांनी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी देखील प्रतिवादी आहेत. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे असल्याचा आमदार सुहास कांदे यांचा दावा आहे.
राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करा: काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
11 सप्टेंबर रोजी छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात एका बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती. नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा नांदगावचा अतिवृष्टी दौरा वादळी ठरला होता. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आणि भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळाले होते. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे अतिवृष्टी भागाचा आढावा घेण्यासाठी नांदगावात पोहोचले होते. तहसील कार्यलयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली.
किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘मास्टरप्लॅन’; भाजपच्या मुसक्या आवळणार?
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी थेट शरद पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात भाषण करताना अनंत गिते यांनी थेट राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. अनंत गिते यांनी म्हटलं, मला जाणीव आहे की शिवसेनेचा नेता या व्यासपीठावरुन बोलतोय. मी आज कोणतंही राजकीय भाष्य करणार नाहीये. शिवसेना काय आहे आणि शिवसैनिकांची जबाबदारी काय हे सांगत आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्मयंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील, तुमची आमची जबाबदारी काय आहे तर गाव सांभाळायचं आहे. आपलं गाव सांभाळायच असताना आम्हाला आघाडीचा विचार करायचा नाहीये… आघाडी आघाडीचं पाहून घेईल.
Read Also :
- ‘तुमची धोतरं पेटतील’ म्हणणाऱ्या शिवसेनेचं राज्यपालासमोर लोटांगण: 24 तासातच राऊतांनी मारली पलटी
- ५ वर्ष नाही, हजार वर्षे तुम्ही सत्ता राखा, पण राज्यातील महिला…- सुधीर मुनगंटीवार आक्रमक
- सत्तांतर होणार? पुणेकरांचा कौल कोणाला? महाविकास आघाडीमुळे एकहाती सत्तेसाठी रस्सीखेच
- राज्यसभेसाठी भाजपच्या निलंबित १२ आमदारांची काँग्रेससोबत सेटलमेंट? फडणवीसांच रोखठोक उत्तर
- ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा