सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारने आज एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आसन व्यवस्थेवरून गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, संभाजीराजे यांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळत सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर, ही बैठक व्यवस्थितपणे पार पडली असून खासदार संभाजीराजेंनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे यांनी, ‘माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्त्वाचे’ असल्याचे मत मांडले आहे.
माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे! छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत. स्वतः पेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे’ असं ट्विट करत, संभाजी राजे यांनी आपल्याला समाज महत्त्वाचा आहे, सारथी महत्त्वाची आहे, असं म्हटलं आहे.
”माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे! छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत. स्वतः पेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे.”, असं ट्विट संभाजीराजेंनी केलं आहे. तसेच, छत्रपती घराण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल, असेही संभाजीराजेंनी म्हटलंय. समाजाने सारथीचा लढा सुरु केला होता, त्याच्या पूर्ततेला सकारात्मक सुरुवात झाली हे जास्त महत्त्वाचे. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्यावर प्रेम व्यक्त केलं, ते पाहून मला समाधान वाटलं. तुम्हा सर्वांचा छत्रपती घराण्यावर असलेला विश्वास जपण्याचा मी प्रयत्न करेल, असेही सर्व शिवभक्तांना उद्देशून संभाजीराजेंनी म्हटले.
माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे!
छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत.
स्वतः पेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे. pic.twitter.com/vjroOAyAoh— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 9, 2020