नवी दिल्ली : देशविरोधी शक्ती तिरस्काराचे विष पसरवत आहेत. लोकशाहीवरील हुकूमशाहीचा प्रभाव वाढत चालला असल्याची जोरदार टीका सोनिया गांधी यांनी सरकारवर केली आहे. छत्तीसगढच्या ‘नया रायपूर’ या नव्याने उभारण्यात येत असलेल्या राजधानीत विधानसभा संकुलाच्या पायाभरणी समारंभानिमित्ताने त्या बोलत होत्या.
यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना कल्पनाही नसेल की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरच लोकशाही अशाप्रकारे धोक्यात येईल. देशात सध्या कुटिल विचारांचा बोलबाला आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.
आज देश एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. गरीबविरोधी, देशद्रोही शक्ती, तसेच सत्तेत असलेले हिंसाचाराचे विष कालवून लोकांमध्ये आपसात भांडणे लावत आहेत, अशी टीका त्यांनी केली.