सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीला महाविकास आघाडीने विरोध दर्शवला असला तरी काँग्रेस कडून या चौकशीला पाठिंबा देण्यात आला आहे. काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी या प्रकरणात केंद्राला सीबीआय चौकशी करायची असेलतर करावी असे म्हटले आहे.
अस्लम शेख म्हणाले की, सुशांत प्रकरण मुंबई पोलीस चांगल्यारितीने तपास करत आहे. पण केंद्राला वाटत असेल यामध्ये आणखी तपासाची गरज आहे तर त्यांनी चौकशी करावी. ही घटना मुंबईत घडली आहे. काही लोकांनी या प्रकरणात मीडियात नावं यावी यासाठी विधाने करत आहे. लॉकडाऊनमुळे शुटींग बंद आहे त्यामुळे या वादात काहीतरी बोलून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई पोलिसांनी तपास केला आहे तरी केंद्राला वाटत असेल सीबीआय चौकशी करावी तर करु शकतात असं ते म्हणाले. तसेच तपासाला ६० दिवस असो, १२० दिवस झाले, केंद्र सरकारला वाटत असेल तर त्यांनी चौकशी करावी असं मत अस्लम शेख यांनी मांडले आहे. सुप्रीम कोर्टात याबाबतचं प्रकरण असताना राज्य सरकार सीबीआयकडे हे प्रकरण सोपवू नये यासाठी विरोध करत आहे.त्यामुळे अस्लम शेख यांच्या वक्तव्याने आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये या प्रकरणावरून मतभेद असल्याचे दिसून आले.