मुंबई : राज्यात महामारीचा फैलाव झाला असून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात असून, यातच महसूलमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित, राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी केली असून, त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा असे देखील मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा धोका आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. pic.twitter.com/JNJXZbpqBe
— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 4, 2021
दादरम्यान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी यापूर्वीच पत्रकारांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही याबाबत त्वरित आणि तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अश्या आशयचं पत्र थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं असून, त्यामुळे आता राज्यातील पत्रकारांचे लसीकरण करण्याबाबत, राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यात काल दिवसभरात महामारीचे एकूण ४८,६२१ नवे बाधित रुग्ण सापडले असून, ५६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, ५९,५०० रुग्णांनी यादरम्यान महामारीवर मात केली आहे.