मुंबई : मुंबईत अनेक महत्त्वाचे विषय आहेत ते प्रश्नच सोडवले जात नाहीत. सरकारचं याकडे लक्षच नाही, ते आपल्या खिसे भरण्यात मश्गुल आहेत. मुंबईत ट्रॅफिक जॅममुळे तीन टक्के घटस्फोट होतात. लोक वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना द्यायला वेळच मिळत नाही असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे महावसुली सरकार आहे. त्यांना लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलं.
कर्नाटकातील ‘हिजाब’ प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले… संस्कृती नेमकी…
‘पहिली गोष्ट ही आहे की महाराष्ट्रात वैयक्तिक कमेंट कोणावरही व्हायला नको, दुसरं राजकारणातल्या महिलांवरती अनेक कमेंट केल्या जातात. परंतु ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे, त्यावर कोणीही अजिबात कमेंट करू नये. महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला कोणतही कामं जमत नसल्याचं आपण पाहतोय. मेट्रोचं काम सुध्दा तसंच पडून आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्नही भिजत पडला आहे. मी हे सगळं सामान्य माणूस म्हणून बोलत आहे. जिथं गरजं आहे, तिथं राज्य सरकारने लक्ष द्यावं. भाजप आणि आरएसएसचे लोक महिलांचा अधिक सन्मान करतात. आज मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे 3 टक्के डिव्होर्स होतात, त्यामुळं राज्य सरकारने त्यांच्या चुकांकडे अधिक लक्ष घालावं असं मी म्हणेन.’
असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार, दोन गोळ्या कारमध्ये घुसल्या, काय घडलं नेमकं…
मुंबईत अनेक इश्यू आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच नॉटी वगैरे नावं लोकांनीच दिली आहेत. त्याचा अर्थ शब्दश: घेऊ नका. त्याचा भावार्थ समजून घ्या, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
Read also:
- मोठी बातमी: नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, राणेंना जामीन मिळणार?
- भाजपामधील नाराजांना राष्ट्रवादीचे ‘रेडकार्पेट’ अन् निष्ठावंतांच्या हातावर तुरी?
- म्हापशाला लवकरच ग्रीन सिटी बनविणार; भाजप उमेदवार जोशुआ डिसोझा यांची ग्वाही
- स्त्रीयांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना भान राखावं; बंडातात्याच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
- राष्ट्रवादीला उसणे अवसान, भाजपालाच सोनेरी दिवस : माजी सभागृह नेते एकनाथ पवार