मुंबई : मुंबईमधल्या वाहतूक कोंडीवरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकार टीकेची झोड उठवली आहे. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आहे हे आता तुम्ही विसरून जा. मी एक सर्वसामान्य महिला आहे. मी देखील एका सर्वसामान्य महिलेप्रमाणे रोज घराच्या बाहेर पडत असते. मलाही खड्डे आणि ट्रॅफिक जॅममुळे त्रास होतो.
बंडातात्या कराडकरांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
आता मुंबईच्या या ट्रॅफिक जॅमवर मी बोलणार नाही का ? मुंबईत वाहतूक कोंडीमुळे जवळपास ३ टक्के जोडप्यांचा घटस्फोट झाला आहे. कारण मुंबईत राहणारे पती-पत्नी आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे मुंबईत घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला.’
मुंबईत सध्या अनेक समस्या प्रलंबित राहिलेल्या आहेत. मुंबईत मेट्रोचे काम पुढे सरकरलेले नाही आणि राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. पण महाविकासआघाडी सरकार यापैकी एकही प्रश्नाकडे लक्ष देत नाही. राज्य सरकार केवळ पक्षपातीपणे काम करत आहे. कारवाई करताना प्रत्येकाला वेगवेगळे निकष लावले जातात, असं देखील अमृता फडणवीस यांनी म्हटले.
बंडातात्या दारु पिऊन बोलले; राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांचे जशास-तसे प्रत्यूत्तर
बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत देखील त्यांनी प्रतिक्रिया मांडली आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले की, मला वाटतं आपल्या देशात स्त्रियांनी आधीच खूप भोगलं आहे. त्यामुळे स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी टिप्पणी करणे चूक आहे. भारतात स्त्रियांविषयी काही बोललं गेलं किंवा त्यांच्यावर अत्याचार झाल्यावरच आंदोलने होतात. मात्र हा प्रश्न लोकांच्या मानसिकतेचा आहे. आपण कोणीही असले तरी स्त्रियांबाबत बोलताना विचार करुन बोलायला पाहिजे. स्त्रियांवर वैयक्तिक टिप्पणी होता कामा नये, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
Read also:
- राष्ट्रवादीला उसणे अवसान, भाजपालाच सोनेरी दिवस : माजी सभागृह नेते एकनाथ पवार
- असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार, दोन गोळ्या कारमध्ये घुसल्या, काय घडलं नेमकं…
- कर्नाटकातील ‘हिजाब’ प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले… संस्कृती नेमकी…
- ‘भाजप सत्तेवर आले तर आपल्याविरुद्ध कारवाई अटळ हे लोबोंना समजून चुकले आहे’=
- बंडातात्यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात; ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी कराडकरांची जाहीर माफी