औरंगाबाद : नुकत्याच राज्यात नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना त्याच्या बालेकिल्ल्यात जबर धक्का दिला. १७ जागांपैकी ११ जागा जिंकत भाजपला धूळ चारण्याचे काम अब्दुल सत्तार यांनी केले.
शिवसैनिक परब यांच्यावरील हल्याचा कट पुण्यात रचला; नितेश राणेंना पुण्याला नेण्याच्या तयारीत
भाजपचे ६ सदस्य निवडून आले होते. ६ सदस्यांमधील ४ सदस्य शिवसेनेने फोडून टाकले आणि एकहाती सत्ता खेचून आणली. राहिलेले दोन सदस्य देखील आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे सोयगांव नगरपंचायतीत शिवसेनेला विरोधकच उरणार नाही अशी परिस्थिती आहे.
देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ मामाजींना भेटावं; मंत्री नवाब मलिकांचा अजब सल्ला
नागरपंचायत निवडणुकीच्या धक्क्यानंतर आता रावसाहेब दानवेंना अब्दुल सत्तारांकडून आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात भाजपचा सुपडा साफ करणार असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. लवकरच भाजपचे पाच हजार कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. शिवजेत मोहिमेची सुरूवात सिल्लोडमधून करण्यात आली. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी हा दावा केला.
उद्धव ठाकरे-अजित पवार म्हणजे ढवळ्या पवळ्याची जोडी – बंडातात्या कराडकर
विधानसभा मतदारसंघात कमळाबाईचा बंदोबस्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे आव्हानच सत्तार यांनी भाजपला दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव संपताच हा प्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा देखील सत्तार यांनी आपल्या भाषणात केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यप्रणाली व शिवसेनेवरील लोकांचा विश्वास यामुळे शिवसेना लवकरच क्रमांक एकचा पक्ष होईल असा विश्वास देखील अब्दुल सत्तर यांनी व्यक्त केला आहे.
Read also:
- बंडातात्या कराडकरांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- नितेश राणेंकडून अमित शाहांचा फोटो असलेलं ‘ते’ ट्विट अचानक डिलीट; काय घडलं नेमकं…
- अजितदादा, अशा नालायकापासून आम्हाला वाचवा; गोपीचंद पडळकरांनी केला व्हिडिओ व्हायरलं
- अखेर ठाकरे सरकारची माघार; भाजपच्या १२ आमदारांच निलंबन घेणार मागे?
- दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; राज्य शिक्षण मंडळाची घोषणा