मुंबई : राज्य सरकारने सुपर मार्केट आणि मोठ्या किराणा दुकानांना वाईन विकण्यास परवानगी दिल्याने विरोधी पक्षाच्या हातात आयतं कोलीत सापडलं आहे. विरोधी पक्षाकडून या मुद्द्यावरुन प्रचंड टीका केली जात आहे. याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना एक अजब सल्ला दिला आहे. “भाजपशासित प्रदेशामध्ये दारुच्या बाबतीत धोरणं आहेत. मला वाटतं राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी शेजारज्या राज्यातील मामाजींना भेटलं पाहिजे. त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यावर भाष्य केलं पाहिजे”, असा खोचक टोला मलिकांनी लगावला आहे. नवाब मलिक यांनी मामाजी असा उल्लेख नेमका कुणाचा केला ते मात्र समजू शकलं नाहीय.
युतीच्या चर्चेत पडू नका, स्वबळावर लढायचयं, महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा – राज ठाकरे
“मागच्या कॅबिनेटमध्ये वाईन पॉलिसीबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. जे भाजपचे लोकं सांगत आहेत की, हे बेवड्यांचं राज्य आहे त्याच भाजपमध्ये सर्वात जास्त दारु पिणारी मंडळी आहे. भाजप नेत्यांचे दारु निर्मितीचे कारखाने आहेत. भाजप नेत्यांचे वाईन शॉप्स आहेत. भाजपचे काही केंद्रीय मंत्री झाले आहेत त्यांचे बार आहेत. काही माजी मंत्र्यांचे बार आहेत. भाजपचा दारुला इतका विरोध असेल तर भाजपच्या सर्व नेते-पदाधिकाऱ्यांनी सर्व दारु विक्रेचे परवाने सरेंडर केले पाहिजेत. दारु पिणार नाही, अशी शपथ भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. त्यांचे काही खासदार सांगतात की, थोडी थोडी दारु पिया करो. भाजपमध्ये सर्वाधिक दारु पिणारी मंडळी. मध्यप्रदेश मद्यप्रदेश झालं आहे. तिथे होमबारची परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी दारुची दुकाने आहेत”, असं नवाब मलिक म्हणाले.
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय सरकार मागे घेणार? शरद पवारांचे सुचक वक्तव्य
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटी खंडणी वसुलीच्या प्रकरणी आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ईडीला दिलेल्या जबाबात धक्कादायक दावे केले आहेत. निलंबित एपीआय सचिन वाझेला पुन्हा सेवेत रुजू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा दबाव होता, असा आरोप सिंग यांनी केला आहे. याबाबत मलिकांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अनिल देशमुख यांना जामीन मिळू नये यासाठी एक वातावरण निर्मितीचा प्रयत्न केंद्रीय सुरक्षा एजन्सी करत आहेत, असं उत्तर दिलं.
समय बडा बलवान होता है; कोठडीत जाण्यापूर्वी ट्विटकरत नितेश राणेंचा शिवसेनेला गंभीर इशारा
“अॅन्टिलिआ बॉम्ब कांड का रचलं गेलं? अॅडिशनस चार्जशिट कधी दाखल होणार? परमबीर सिंगांच्या इमारतीत नेमकं कोणत्या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली होती? सर्व महत्त्वाची माहिती लपवली जात आहे. राजकीय षडयंत्रच्या ध्येयातून हा सर्व कट रचला गेला. हे प्रकरण आज नाही तर उद्या, कधीनाकधी लोकांसमोर येईल. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यासाठी वातावरण निर्मितीचं काम एजन्सीच्या माध्यमातून होतंय. त्यांनी कितीही नेत्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान केलं तरी सत्य जनतेसमोर नक्की येणार”, असं मलिक म्हणाले.
Read also:
- शिवसैनिक परब यांच्यावरील हल्याचा कट पुण्यात रचला; नितेश राणेंना पुण्याला नेण्याच्या तयारीत
- ‘जोशुआ यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करून दाखविली, कांदोळकर यांच्यात नेतृत्व गुण नाही’
- हम झुकेंगे नहीं.! खासदार संजय राऊतांच केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला उद्देशून सूचक ट्विट
- पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांनी रायन ब्रागांझा घायाळ; मायकल लोबोंसमोरच झाली शाब्दिक चकमक
- आपणं यांना पाहिलंत का? माननीय खासदार हरवल्या आहेत; पूनम महाजनांविरोधात शिवसैनिकांची आक्रमक बॅनरबाजी