नवी दिल्ली : भारतात महामारीच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. देशभरात बाधितांची रुग्णसंख्या वाढत असून, मृत्यूदराचा आलेख देखील उंचावत आहे. परिणामी देशाची आरोग्ययंत्रणा महामारीला थांबवण्यासाठी अपुरी पडत असून, यामुळे देशभरातून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
यातच गेल्या २४ तासांत देशात तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. हा एकप्रकरचा उच्चांक असून, २४ तासांत ४ लाखांहून जास्त बाधित रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. त्यामुळे देशभरातून नागरिकांकडून, महामारीला थोपवण्यासाठी केल्या जात असलेल्या नियोजनावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच देशभरातील भाजपेतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांकडून, काय करतेय केंद्र सरकार, अशा प्रकारचा प्रातिनिधिक सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला काही सूचना केल्या आहेत. सोनिया गांधींच्या या संदेशाची एक व्हिडिओ क्लिप काँग्रेसकडून ट्विट करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये त्यांनी, देशातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि काळजीसाठी प्रार्थना केली आहे. तसेच, ज्यांचे जीव या महामारीच्या दरम्यान गेले आहेत, त्यांच्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात सहानुभूती दर्शवली आहे.
कोरोना महामारी के इस चुनौतीपूर्ण समय में आपके व आपके परिवार की सुरक्षा और अच्छे स्वास्थ्य की कामना करती हूं। वह लाखों परिवार जिन्होंने अपने परिजनों को खोया है, उनके प्रति दिल से अपनी संवेदना व्यक्त करती हूं।
– कांग्रेस अध्यक्षा, श्रीमती सोनिया गांधी#COVID19India pic.twitter.com/btmCeG8K6B
— Congress (@INCIndia) May 1, 2021
तसेच देशातील परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी केंद्र सरकारला काही सूचना केल्या आहेत, :-
यावेळी त्यांनी महामारीशी लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील सर्व योद्ध्यांना सलाम केला आहे. तसेच नागरिकांना देखील त्यांनी, “एकमेकांचा हात धरून, एकमेकांचा आधार आणि एकमेकांची ताकदही बनायचं आहे”, असं सांगत, “जेवढी शक्य होईल तेवढी एकमेकांची सर्वोतोपरी मदत करा”, असं आवाहन केलं आहे.