पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हजर जबाबीपणा सर्वांना माहित आहे. ताडकन निर्णय घेण्याची क्षमता आणि हातात घेतलेले काम चोखरित्या पार पाडण्यासाठी अजित पवार ओळखले जातात. आज देखील असेच काहीसे घडले,अजित पवार आपल्या गाडीने मुंबईला चालले होते मात्र वाशीपर्यंत गेल्यावर अचानक पणे त्यांनी गाडी वळवली आणि ते पुन्हा पुण्याकडे रवाना झाले.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अजितदादा पुण्याहून मुंबईसाठी येत होते. दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती MMRDA ने दिली. त्यामुळे वाशीपर्यंत पोहचलेले अजित पवार पुन्हा यु-टर्न घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी ६ वाजता अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर मेट्रो अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर कोविड १९ बाबत अधिकाऱ्यांची बैठक अजितदादांनी घेतली.
मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला केवळ १६ जणांनाच आमंत्रण दिले गेले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी हे उपस्थित राहणार होते.
Read Also
के के रेंजबाबत संरक्षण मंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यशhttps://t.co/lMHsZTBMMW#NileshLanke #SharadPawar #NCP #KKRenj #MarathiNews #RajnathSingh @LankeMla
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 18, 2020