कोरोनामुळे अनेक क्षेत्रावर परिणाम झाले असून अर्थव्यवस्था कोडमडली आहे. अर्थव्यवस्थेला भरारी तसेच गरिबी हटवण्यासाठी रोजगार निर्मिती गरजेची असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभाच्या वतीने आयोजित वेबिनार मध्ये ते बोलत होते. येणाऱ्या काळात एमएसएमई क्षेत्रातली संधी विषयी त्यांनी अधिक माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणले, “कोरोनामुळे उद्योग व्यवसायावर संकट आले आहे. कोरोनासोबत आर्थिक संकट देखील आपल्यावर आहे. गरीब मजदूर देखील मोठ्या अडचणीत आहेत . या अडचणीच्या काळात सरकार तुमच्या सोबत असून वेग वेगळ्या निर्णयाची अंबलबजावणी करत आहे.
देशाचा १६ टक्के जीडीपी शेती व त्याच्याशी निगडित उद्योगावर आधारित आहे तर २२ ते २४ टक्के जीडीपी उत्पादन क्षेत्रावर आधारित आहे तर ५२ ते ५६ टक्के जीडीपी सर्व्हिस सेक्टरवर आधारित आहे ग्रामीण भागात गरिबी यातला ६० ते ६५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागातली असून इथे गरिबीची संख्या जास्त आहे त्यामुळे गरिबी हटवण्यासाठी रोजगार निर्मिती गरजेची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
कोरोनाबाबत बोलताना ते म्हणाले , “कोरोनाचे संकट केवळ भारावरच नाहीतर जगावर आहे. अनेक संकटांचा आपण सामना केला तसेच त्यावर मातहि केली. कोरोनाचे संकट देखील लवकरच जाईल जगभरातील अनेक शास्त्रज्ञ लसीचा शोध घेत आहेत तोपर्यंत आपण काळजी घेणे गरजेचे आहे.