उस्मानाबाद : कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले आहे. भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे. दौऱ्याच्याआधी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही जणांना चार हजार, पाच हजार अशी मदत देण्यात आली. अशा प्रकारची मदत करुन शेतकऱ्यांच्या जखणेवर मीठ चोळण्याचं काम करु नये, अशी जोरदार टीका यावेळी फडणवीस यांनी केली.
फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना प्रती हेक्टर २५ हजारांची मदत करण्याची मागणी केली होती यासंबंधीचा व्हिडीओ दाखवला.
फडणवीस म्हणाले की, जे सत्तेत असतात, त्यांनी संयम दाखवायचा असतो, त्यांना शेतकऱ्यांची काहीही लेनदेन नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. सरकारने मदत करण्याची गरज आहे, तात्काळ जे काही पंचनामे ते करा, ज्या ठिकाणी पंचनामे शक्य नसेल तर मोबाईलने पाठवलेला फोटो ग्राह्य धरावा.