पुणे : पुणे महानगरपालिका सभागृहात भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे ऑनलाईन पदधतीने लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकल्पामुळे पुण्यातील पूर्व भागातील सुमारे 15 लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.
ज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुणे व पिंपरी शहराची वाढ झपाट्याने होत आहे. त्यात महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराच्या गरजा देखील वाढणार आहेत. मेट्रो, पिण्याचे पाणी, वाहतूक, उदयोग धंदे, आरोग्य यांचा समावेश आहे. परंतू, पुण्याचे प्रश्न मार्गी लावताना आता चिंता करायची गरज नाही . कारण राज्याची तिजोरीच पुण्याकडे आहे, अशी टिप्पणी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दादा, दोन तीन दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा, किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या. विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची परंपरा आहे, अशी टोलेबाजी देखील यावेळी फडणवीसांनी केली.