मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मख्यमंत्र्यांनासह महाविकास आघाडीतील सगळ्याच नेत्यांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. केवळ भाजपला हरवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या काळातील सगळे प्रकल्प थांबवून राज्यात आघाडीच्या माध्यामातून आतोनात नुकसान चालंल आहे. असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर त्यांनी राऊतांच्या आरोपांवर देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“लक्ष्मण जगताप यांनी दाखविलेली आश्वासक मुद्रा कधीच विसरू शकणार नाही”; देवेंद्र फडणवीस
आम्ही जिंकल्यानंतर अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काहींचे चेहरे पडलेत तर काही नेते बावळचाळलेत तर काही लोक फिसाटले आहेत. परंतु आम्ही जिंकलो आहे. त्यामुळे जिंकल्याने नम्रता सोडायची नसते, असं म्हणत भाजपचे उमेदवार कोणामुळे जिंकले आहेत. हे सांगण्याची हिंमत त्यांच्याकडे नसून त्यांना सरकार टिकावायचं आहे. अपक्ष आमदारांना धमक्या देऊ काही होणार नाही. असा टोला देखील त्यांना संजय राऊतांना लगावला.
“नुुपुर शर्मा प्रकरणात मोदी, शहा, योगींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा” ;अमोल मिटकरी
मी नशिबवान आहे की माझं मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपुरमधील घर तंतोतंत नियमात असल्याने मला नोटीस आली नाही. केवळ बदल्याची भावना म्हणून काही लोकांच्या घरावर यांनी कारवाई केली. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या पाठित खंजीर खुपसून जी सत्ता घेतली. ती सत्ता तरी व्यवस्थित चालवून दाखवा. असं आव्हान देखील त्यांनी दिलं.
नुपुर शर्मा यांच्याविरोधात राज्यात, देशात मुस्लिम बांधव आक्रमक; अनेक ठिकाणी दगडफेक
दरम्यान, गेली अडीच वर्ष झालं परंतु या सरकारने जनहिताचं एकही काम केलं नाही. जे काही महाराष्ट्रात नवनवीन गोष्टी घडत आहेत. ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे सुरू आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणीस यांनी इंधनावरील कर कपातीवरून देखील त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच येत्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप विजयी होईल. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सत्तेत येईल,अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा लावायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असंही ते म्हणाले.
Read also:
- “कोण फुटलं, का फुटलं.? आज ना उद्या ते कळेल”; राऊतांच्या आरोपांवर भोंडेंचं समर्थन
- “घोडेबाजारातील असतो तर अगोदरच विकलो गेलो असतो”; राऊतांना संजयमामांचं जोरदार प्रत्युत्तर
- निवडणूक राज्यसभेची अन् चर्चा पुणे जिल्ह्यातील ‘या’ चार आमदारांची !
- “केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या, 2024 ला हा हिशोब चुकता करू”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
- “चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरचा पैलवानच वाढदिवसानिमित्ताने भेट दिला”; देवेंद्र फडणवीस