मुंबई : भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या असून देशभरात जोरदार आंदोलने केली जात आहेत. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, तसेच दिल्लीतील जामा मशिदीजवळ आज मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाले होते. तसेच नुपुर शर्मा यांच्या राजीनामीची त्यांनी मागणी केली. याचे पडसाद महाराष्ट्रात देखील बघायला मिळाले.
“निजामाची औलाद एमआयएमची मदत घेऊन शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघड पडलं”
महाराष्ट्रातील सोलापुर आणि औरंगाबाद येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवाचा मोठा जमाव गोळा झाला. त्यामुळे राज्यात आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत काही मुस्लिम बांधवांनी दगडफेक देखील केली. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे राज्यात कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गृहमंत्र्यांनी सुचना दिल्या आहेत.
एक मत लाखो मोलाचं; भाजपच्या आमदार मतदानासाठी स्ट्रेचरवरून विधिमंडळात दाखल
मुस्लिम बांधवाबाबत अगदी खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य केलं जात आहे. त्याचा निषेध संपुर्ण भारत तसेच जगात होत आहे. आम्ही आतापर्यंत जे लोक धर्माच्या नावाखाली वातावरण दुषित करत आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करेल याची वाट पाहत होतो. पंरतु काही लोकांचं असा उद्धेश आहे की , वातावरण दुषित केलं जाईल. असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू; दीड तासात 143 आमदारांनी केलं मतदान
औरंगाबाद याठिकाणी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनात असे काही लोकं होते ते जाणुनबुजून आंदोनल चिघळण्याचा प्रयत्न करत आहेत. असंही ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी आंदोलन शांतेत करावं अशा सुचना देखील कार्यकर्त्यांनी दिल्या. नुपुर शर्मा यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
व्हिलचेअरवरून भाजपचे दोन आमदार विधानभवनात येणार ; राजकीय घडामोडींना वेग
दरम्यान, मशिदीमधून नमाज पठण केल्यानंतर सोलापुर आणि औरंगाबाद येथून काही मुस्लिम बांधव एकत्र जमले, आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झालेत. त्यामुळे अचानक काही ठिकाणी जमावाचा मोठा समुह आक्रमक झाले आणि काही ठिकाणी हिंसक घटना देखील घडल्या. मोहम्मद पैगंबरांचा अपमान करून देशात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा प्रकणात चुप्पी साधलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी , अमित शर्मा, योगी आदित्यनाथ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Read also:
- “ज्यांनी हनुमान चालिसाचा अपमान केला, त्याचा विनाश होणार”; रवी राणांचं मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टिकास्त्र
- “आजपासून भाजपची उलटी गिनती सुरू”; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
- ..म्हणून एमआयएमनं आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला; रोहित पवारांनी सांगितलं खरं कारण
- मतदानावेळी मोठा घोळ; जितेंद्र आव्हाड, कांदे, यशोमती ठाकुर यांचं मत बाद ठरण्याची भाजपची मागणी
- “हवेमध्ये उडणारे भाजपचे विमान संध्याकाळी जमिनीवर येईल”