मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीकरीता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वप्रथम मतदान केलं. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीच्या अन्य काही आमदारांनीही मतदान केलं आहे. एकुण 6 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीकरीता 7 उमेदवार रिंगणात उभे असून त्याचा निकाल आज सायंकाळी लागणार आहे.
“ज्यांना घोडेबाजार होईल, असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे असतील”
राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून विधानसभेच्या निवडणुकीत 54 आमदार निवडून आले होते. मात्र पंढरपुरमधील आमदारांच्या निधनांनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीचं संख्याबळ 53 झालं. त्याचबरोबर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर इडीने केलेल्या कारवाईमुळे त्यांचं दोन मत वाया गेल्याने त्यांच्याकडे आता 51 आमदार आहेत.
“शिवसेनेमुळेच ‘उमा खापरे’ यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी”; दिपाली सय्यद
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदारांनी मतदान केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची बस विधानभवनात दाखल झाली. त्यामुळे आता पर्यंत दीड तासात जवळपास 143 आमदारांनी मतदान केलं आहे. भाजप तसेच महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांनी आपलाच उमेदवार जिकंणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, “गेल्या 40 वर्षात..;”
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात मोठी चुरस बघायला मिळणार आहे, कारण भाजपकडून अतिरिक्त उमेदवार म्हणून धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर भाजपकडून अनिल बोंडे, पियुष गोयल, तर शिवसेनेकडून संजय राऊतांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रफुल पटेल, आणि काॅंग्रेसकडून इम्रान प्रतापगढ़ी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा निकाल आज सायंकाळी लागणार आहे.
Read also:
- व्हिलचेअरवरून भाजपचे दोन आमदार विधानभवनात येणार ; राजकीय घडामोडींना वेग
- “न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गालावर बारावी थप्पट मारली”; जामीन अर्ज फेटाळ्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
- “उद्या भाजपला पळता भुई थोडी होणार, तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक”
- इडीने केला आघाडीचा घात; निवडणुकीसाठी नवाब-देशमुखांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
- पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली पाहिजे होती, याचा परिणाम होईल; छगन भुजबळ यांचं सुचक वक्तव्य