मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि महत्वाच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत डावलण्यात आलं. त्यांच्याजागी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यावरून आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा मापच काढला; म्हणाले, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’..;”
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल भाजपच्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली. यात प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांचा या निवडणुकीत समावेश आहे. गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे यांना भाजप विधान परिषदेवर पाठवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं.
विधान परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडमधून कोणाला मिळणार संधी? राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार ‘फिल्डिंग’
तसेच उमा खापरे आणि दिपाली सय्यद यांच्यातील मागील काही दिवसापासून राजकीय संघर्ष जोरदार सुरू आहे. उमा खापरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिपाली सय्यद म्हणाल्या की, उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे. शिवसेनेमुळे भाजपात कोणी आमदार बनत असेल तर त्याबद्दल शिवसेनेचे कौतुकच आहे. असं म्हणत त्यांनी उमा खापरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
“लाचार संजय राऊत यांना ‘स्मृतीभ्रंश’ झालाय”; ‘त्या’ व्यक्तव्यावरून मनसेचा राऊतांना टोला
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 10 तारखेला मतदान होत आहे. या निवडणुकीत 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात उतरणार आहे. त्याच दिवशी मतदानाचा निकाल देखील लागणार आहे. त्यानंतर 20 जून ला विधान परिषदेसाठी मतदान होत आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, “गेल्या 40 वर्षात..;”
- “ना हिंदुत्व, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”; मनसेने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
- “भाजपवाले चॉकलेट दाखवून पुढेही तुमचा वापर करतील”
- “चहापेक्षा किटली गरम”; त्यावरून भाजपचा उद्धव ठाकरे, राऊतांना टोला
- अखेर नाथाभाऊंचा राजकीय वनवास संपला; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर उमेदवारी जाहीर