मुंबई : राज्यात राज्यसभेसाठी 10 जून रोजी मतदान होत असून त्यानंतर लगेच विधान परिषदेकरीता निवडणुक होत आहे. एकुण 10 जागासाठी होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणुक राज्यसभेसाठीच रंगतदार होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना , आणि काॅंग्रेसने उमेदवार जाही केले असून आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील उमेदवारांची नावे घोषित केली. यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विधान परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडमधून कोणाला मिळणार संधी? राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार ‘फिल्डिंग’
एकनाथ खडसे म्हणाले की, ज्या निष्ठेने गेल्या ४० वर्षात काम केले. त्याहून अधिक ताकदीने आता राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार. मला विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाध्यक्ष आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रदेशाध्यक्ष जयंतराव व सर्व नेत्यांचे विनम्र आभार, असंही ते म्हणाले.
“लाचार संजय राऊत यांना ‘स्मृतीभ्रंश’ झालाय”; ‘त्या’ व्यक्तव्यावरून मनसेचा राऊतांना टोला
भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रा. राम शिंदे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच काॅंग्रेसकडून भाई जगताप, आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना संधी देण्यात येणार आहे. जयंत पाटील यांनी देखील आज राष्ट्रवादी काॅंग्रेसकडील उमेदवारांची नावे घोषित केली आहे.
देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह ;संजय राऊत म्हणाले..;
भाजपमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील पुन्हा देखील संधी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारी विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील असा विश्वास देखील जंयत पाटील व्यक्त केला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेच्या १० जागासांठी मतदान होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एका गटाची मागणी विधान परिषद मिळावी अशी आहे.
Read also:
- “ना हिंदुत्व, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”; मनसेने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
- “भाजपवाले चॉकलेट दाखवून पुढेही तुमचा वापर करतील”
- “चहापेक्षा किटली गरम”; त्यावरून भाजपचा उद्धव ठाकरे, राऊतांना टोला
- अखेर नाथाभाऊंचा राजकीय वनवास संपला; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर उमेदवारी जाहीर
- फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा मापच काढला; म्हणाले, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’..;”