मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यसभेसाठी येत्या 10 तारखेला मतदान होत असून एकुण 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात उभे राहिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाला एक एक मत निवडणुक जिंकण्यासाठी महत्वाचं आहे. यातच आता महाविकास आघाडीतील मोठा धक्का बसला आहे.
“भाजपवाले चॉकलेट दाखवून पुढेही तुमचा वापर करतील”
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी जामीन अर्ज सादर केला होता. मात्र गुरूवारी यावर सुनावणी झाल्यानंतर त्यांना मतदानासाठी जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांना दोन मतांवर पाणी फेरावं लागणार आहे.
“चहापेक्षा किटली गरम”; त्यावरून भाजपचा उद्धव ठाकरे, राऊतांना टोला
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करणे हे लोकप्रतिधींचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी हे मतदान केले नाही. तर ते आपल्या कर्तव्यापासून वंचित राहितील. त्यामुळे जनतेच्या मताचाही अनादर होईल, असा युक्तिवाद देशमुख-मलिक यांच्या वकिलांना न्यायालयात मांडला. परंतु लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गेत कैद्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचा दावा इडीने न्यायालयात केला, आणि त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
अखेर नाथाभाऊंचा राजकीय वनवास संपला; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर उमेदवारी जाहीर
दरम्यान, येत्या 10 जून रोजी राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान होत आहे. भाजपने या निवडणुकीत 3 उमेदवार दिले असून शिवसेनेने 2, राष्ट्रवादी काॅंग्रेसचा 1 काॅंग्रेसचा 1 दिला आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारांचं मत याठिकाणी महत्वपूर्ण ठरणार आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात खुप प्रयत्न केले होते. मात्र त्यावर आज अखेर सुनावणी आली आहे.
Read also:
- पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली पाहिजे होती, याचा परिणाम होईल; छगन भुजबळ यांचं सुचक वक्तव्य
- “ज्यांना घोडेबाजार होईल, असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे असतील”
- “शिवसेनेमुळेच ‘उमा खापरे’ यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी”; दिपाली सय्यद
- उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, “गेल्या 40 वर्षात..;”
- “ना हिंदुत्व, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”; मनसेने मुख्यमंत्र्यांना डिवचलं