मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या 20 जून रोजी मतदान होत आहे. त्यासाठी राज्यातील राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. संख्याबळानुसार भाजपला 4 तर आघाडीतील प्रत्येक पक्षाला 2 उमेदवार सहज निवडून आणण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकीत भाजपने सदा भाऊ खोत यांना अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अखेर नाथाभाऊंचा राजकीय वनवास संपला; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर उमेदवारी जाहीर
माझ्या खिशात शेतकऱ्याच्या घामाची माती आहे. म्हणून ज्याचं पोट शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी आमदार आम्हाला मतदान करेल, अशी आशा सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्याच्या घामाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मला आमदार केलं. असंही ते म्हणाले.
फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा मापच काढला; म्हणाले, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’..;”
घोडेबाजार होईल असं म्हणणं म्हणजे या राज्यातील 12 कोटी जनतेचा हा अपमान आहे. कारण आपल्या लोकप्रतिनिधीने आपल्यासाठी काम करायला पाहिजे ही भूमिका ठेऊन मतदारराजा त्याला पाठवत असतो. या लोकप्रतिनिधीवर विश्वास असतो म्हणून मतदारराजा त्याला पाठवत असतो. त्यामुळे ज्यांना घोडेबाजार होईल असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे असतील, कारण घोड्याला खायला घालावं लागतं असा टोला देखील त्यांनी महाविकास आघाडीला लावला.
विधान परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडमधून कोणाला मिळणार संधी? राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार ‘फिल्डिंग’
दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीत सदाभाऊ खोतांची उमेदवारी यावेळी भाजपने नाकारली. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, आणि राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच पंकजा मुंडे, विनायक मेटे, आणि माधव भंडारी यांना देखील भाजपने डावलेले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Read also:
- “शिवसेनेमुळेच ‘उमा खापरे’ यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी”; दिपाली सय्यद
- उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, “गेल्या 40 वर्षात..;”
- “ना हिंदुत्व, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”; मनसेने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
- “भाजपवाले चॉकलेट दाखवून पुढेही तुमचा वापर करतील”
- “चहापेक्षा किटली गरम”; त्यावरून भाजपचा उद्धव ठाकरे, राऊतांना टोला