मुंबई : राज्यसभेच्या 6 जागांसाठी उद्या 10 जून रोजी मतदान होत आहे. भाजपने तिन उमेदवार दिले असून महाविकास आघाडीकडून 4 उमेदवार म्हणजे एकुण 7 उमेदवार रिंगणार आहेत. या निवडणुकीत अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“ना हिंदुत्व, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”; मनसेने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
भाजपकडून अनिल बोंडे, पियुष गोयल, आणि तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रफुल पटेल आणि काॅंग्रेसकडून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यासाठी उद्या मतदान होत आहे.
“भाजपवाले चॉकलेट दाखवून पुढेही तुमचा वापर करतील”
याबाबत अमोल मिटकरी म्हणाले की, उद्या भाजपला पळता भुई थोडी होणार, तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक, असा सुचक इशाराही देखील त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेले नसताना सुद्धा त्यांना मताधिकार नाकारणे ही संविधानाची पायमल्ली ठरत नाही का? असा सवाल करत जो निकाल आलाय तो आश्चर्यकारक असल्याचंही ते म्हणाले.
“चहापेक्षा किटली गरम”; त्यावरून भाजपचा उद्धव ठाकरे, राऊतांना टोला
दरम्यान, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा न्यायालयाने जामीन अर्ज फेेटाळून लावला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन मतांवर पाणी फेरावं लागणार आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याबाबत इडीने आपील केली होती. त्यानुसार त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
Read also:
- इडीने केला आघाडीचा घात; निवडणुकीसाठी नवाब-देशमुखांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
- पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली पाहिजे होती, याचा परिणाम होईल; छगन भुजबळ यांचं सुचक वक्तव्य
- “ज्यांना घोडेबाजार होईल, असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे असतील”
- “शिवसेनेमुळेच ‘उमा खापरे’ यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी”; दिपाली सय्यद
- उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, “गेल्या 40 वर्षात..;”