मुंबई : मागील काही महिन्यापासून चर्चेत असलेले अमरावतीचे रवी राणा यांनी आज विधानभवनात येऊन राज्यसभेसाठी मतदान केले. विधानभवानात आले तेव्हा त्यांच्या हातात हनुमान चालिसाचं पुस्तक होतं. तसेच मी १०१ वेळा हनुमान चालिसाचं पठण करून आलो असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच आज राज्यातील राजकारणात मोठा भुकंप होणार आहे असंही ते म्हणाले.
एक मत लाखो मोलाचं; भाजपच्या आमदार मतदानासाठी स्ट्रेचरवरून विधिमंडळात दाखल
मुंबईतील खार येथील निवासस्थानी रवी राणा यांनी हनुमान चालिसाचं पठण केल्याचं सांगितलं. मी १०१ वेळा हनुमान चालिसा वाचून आलो आहे. हनुमान चालीसा मातोश्री समोर म्हटली तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता विधान भनवात जात आहे. आता गुन्हा दाखल होतोय का ते पाहतो. उद्धव ठाकरे म्हणताहेत काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचा. मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरे ज्या वेळी हनुमान चालिसा वाचतील, त्यादिवशी मी काश्मिरमध्ये जाऊन वाचेन. ज्यांनी हनुमान चालिसाचा अपमान केला. त्याचा विनाश होणार आहे. असंही ते म्हणाले.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू; दीड तासात 143 आमदारांनी केलं मतदान
जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप सोडल्यानंतर राज्यसभेसाठी मतदान सुरक्षित पार पाडलं. भाजपकडून धनंजय महाडिक आणि शिवसेनेकडून संजय पवार यांचं भविष्य आज सायंकाळी कळणार आहे. त्यामुळे या निकालाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
व्हिलचेअरवरून भाजपचे दोन आमदार विधानभवनात येणार ; राजकीय घडामोडींना वेग
दरम्यान, एमआयएम पक्षातील दोन आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं. त्यानंतर शिवसेनेवर भाजप आणि मनसेकडून जोरदार टिका करण्यात आली. तत्पर्वी आज राज्यसभेच्या 6 उमेदवारांसाठी मतदान झालं असून त्याचा निकाल आज सायंकाळी लागणार आहे.
Read also:
- “आजपासून भाजपची उलटी गिनती सुरू”; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
- ..म्हणून एमआयएमनं आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला; रोहित पवारांनी सांगितलं खरं कारण
- मतदानावेळी मोठा घोळ; जितेंद्र आव्हाड, कांदे, यशोमती ठाकुर यांचं मत बाद ठरण्याची भाजपची मागणी
- “हवेमध्ये उडणारे भाजपचे विमान संध्याकाळी जमिनीवर येईल”
- “निजामाची औलाद एमआयएमची मदत घेऊन शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघड पडलं”