मुंबई : राज्यसभेच्या एकुण ६ जागांसाठी विधिमंडळात मतदान सुरू झालं आहे. त्याचा निकाल आज सायंकाळी लागणार असून सकाळी ९ वाजता सुरू झाल्यानंतर गेल्या दीड तासात १४३ आमदारांनी मतदान केलं आहे. इंदापुरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वप्रथम मतदान करून राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात केली.
इडीने केला आघाडीचा घात; निवडणुकीसाठी नवाब-देशमुखांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे सध्या ५१ आमदार, शिवसेनेकडे ५६ आणि काॅंग्रेसकडे एकुण ४४ आमदार असून महाविकास आघाडीला इतर अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला आहे. भाजप देखील या निवडणुकीत भक्कम स्थितीत आहे. तसेच एमआयएमच्या दोन आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविल्यामुळे मनसे आता शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली पाहिजे होती, याचा परिणाम होईल; छगन भुजबळ यांचं सुचक वक्तव्य
राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणुक सुरू आहे. जनता असंख्या अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. त्या निजामाची औलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली नाही. तर शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघड पडलं आहे. अशी टिका मनसे नेत गजानन काळे यांनी केली आहे.
“ज्यांना घोडेबाजार होईल, असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे असतील”
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मशिदीवरील प्रकरण आणि त्यानंतर औरंगाबाद येथील औरंगजेबच्या कबरीवरून मनसे आणि शिवसेनेत मोठा राजकीय संघर्ष उफळून आला होता. त्याचबरोबर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि आमदार अकबरूद्दीन औवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीसमोर नतमस्तक झाल्यानंतर मनसेने सरकारवर टिकास्त्र सोडलं होतं.
Read also:
- एक मत लाखो मोलाचं; भाजपच्या आमदार मतदानासाठी स्ट्रेचरवरून विधिमंडळात दाखल
- राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू; दीड तासात 143 आमदारांनी केलं मतदान
- व्हिलचेअरवरून भाजपचे दोन आमदार विधानभवनात येणार ; राजकीय घडामोडींना वेग
- “न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गालावर बारावी थप्पट मारली”; जामीन अर्ज फेटाळ्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
- “उद्या भाजपला पळता भुई थोडी होणार, तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक”