मुंबई : पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा भाजपला द्या, या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं विधान केलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यात ऑपरेशन लोटसचे संकेत देण्यात आले होतं. फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू,” असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केले आहे.
फडणीस म्हणाले, “सध्या आमच लक्ष कोरोना स्थिती कशी आटोक्यात आणता येईल यावर आहे. मात्र, योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू”. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात केंद्र सरकार सतत राज्य सरकारला सुचना करत होत. मात्र राज्य सरकारने नियोजन शून्यता दाखवली. त्यामुळे ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन प्लॅान्ट वेळेत उभे केले असते तर अनेक रूग्णांचे प्राण वाचवू शकलो असतो, असे ते म्हणाले.
देशातील अनेक राज्यात तैाते वादळामुळे नुकसान केलं आहे. १००० कोटींची मदत गुजरातला करण्यात आली. त्यांच्या प्रेस नोटमध्ये अस देखील सांगितल आहे कि इतर राज्यांना मदत लवकरच मिळणार आहे. इतर कोणत्याही राज्यांनी मदत मिळणार नाही, अस म्हटलं नाही, मात्र फक्त महाराष्ट्रातील मंत्र्यांची स्क्रिप्ट तयार करुन केंद्रावर टीका केली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
“मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला फक्त जनतेची फसवणूक करायची आहे. सरकार जर मराठा आरक्षण संदर्भात गंभीर असत तर मागासवर्गीय आयोगाचा अहवालासंदर्भात बाजू मांडण्यास कमी पडलं नसत. आम्ही मजबूत कायदा केला आणि तो टिकवला देखील मात्र, आताच्या राज्य सरकारला ते टिकवता आल नाही,” असे फडणवीस म्हणाले.