अहमदनगर: महाराष्ट्रात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर,औरंगाबाद या जिल्हांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त रुग्ण संख्या आहे. कालच अहमदनगर मध्ये ऑक्सिजनचा साठा संपत आलेला होता. यावरून अनेक सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी वर्ग आणि स्थानिक नेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. जिल्ह्यात काल ऑक्सीजनची परिस्थिती बिकट झाल्याच्या पार्श्वभूमिवर आ. विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निष्क्रीय कारभाराला पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील तीनही मंत्री जबाबदार असल्याचा थेट आरोप केला.
जिल्ह्यातील रुग्णालयांना मंजुर असलेला ऑक्सीजनचा कोठा पुणे जिल्ह्यातील आधिकाऱ्यांनी कोणतीही पुर्व सुचना न देता अडवून ठेवत इतर जिल्ह्यात वळविण्याचा प्रयत्न केला. ही माहीती आपल्याला समजल्यानंतर याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून या गंभिर परिस्थितीकडे लक्ष वेधले. त्यानंतर राजंणगाव येथे आडवून ठेवलेले ऑक्सीजनचे टँकर नगर जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला. याबाबत पालकमंत्र्यासह जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांचा निष्काळजीपणाच समोर आला. त्यांची कर्तबगारीही सिध्द झाली, प्रत्येक निर्णयात जर मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागत असेल तर मंत्री करतात काय ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. महाभकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा सर्ववेळ भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर टिका करण्यात जात आहे .
विरोधी पक्षनेते फडणवीस यांना दिल्लीतून मदत आणण्याचे सल्ले देणाऱ्यांची कोव्हीड काळात जिल्हयात कर्तबागारी काय? असा खोचक सवाल सवाल करुन मंत्री थोरातांवर त्यांनी निशाणा साधला. सातत्याने केंद्र सरकार विरोधी पक्षला बेजबाबदार वक्तव्यातून लक्ष करणारे मंत्री नबाब मलीक स्वत: ला समजतात तरी काय. राज्याकरीता विरोधी पक्षनेत्यांनी ५० हजार रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध करुन तरी आणले. पण विनाकारण त्याचेही राजकारण झाले. वास्तविक जिल्हयात एवढी भयानक परिस्थिती असताना पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात तळ ठोकायला हवा होता, परंतू त्यांना जिल्ह्यातील जनतेपक्षाही त्यांच्या गोकूळ दूध संघाची निवडणूक अधिक महत्वाची वाटत असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.