मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली होती. त्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना राणावतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कंगनाबाबत भाष्य केले आहे. अभिनेत्री कंगना राणावत जे काही म्हणाली, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. भाजपाने सुद्धा याचा निषेध केला आहे. तुम्ही भले कंगना रानावतच्या मताशी सहमत नसाल पण प्रत्येक नागरिकांची सुरक्षा करणं ही राज्याची जबाबदारी आहे असे मत आज देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
वडेट्टीवारांनी देखील केले भाष्य
अनेक राजकीय नेत्यांनी देखील कंगनाबाबत भाष्य केले आहे. कंगना राणावतला Y दर्जाची सुरक्षा देऊन भाजपने महाराष्ट्राच्या मातीसोबत गद्दारी केली असल्याचे मत विजय वड्डेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच आगामी काळात कंगना भाजपकडून विधानपरिषद किंवा राज्यसभेवर दिसल्या तर यात नवल वाटायला नको असा खोचक टोला यावेळी वड्डेट्टीवर यांनी लगावला आहे.
Read Also
'त्यांची अवस्था बघून दाऊद धमकी मागे घ्यायचा'; निलेश राणेंचा टोलाhttps://t.co/BnjtSgcOhG@meNeeleshNRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 7, 2020