सरकारचे शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा वेळोवेळी व्हावा, अशी मागणी करताना सरकारचे यावर नियंत्रण राहिलेले नसल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे .
मी पाच वर्ष कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई निर्माण झाली नाही. त्यावेळी समन्वय होता. नीटनेटकेपणाने त्यावेळी खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. युरिया खताचे दर हे स्थिर ठेवले. आता मात्र सरकारमधील कोणाचाच समन्वय राहिलेला नाही, असे म्हणत खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात ऑक्टोबर 2014 ते जून 2016 या दीड वर्षाच्या कालावधीत एकनाथ खडसे यांनी कृषिमंत्रीपद सांभाळले होते. दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात ऑक्टोबर 2014 ते जून 2016 या दीड वर्षाच्या कालावधीत एकनाथ खडसे यांनी कृषिमंत्रीपद सांभाळले होते.