कराड: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार यावर खलबत चालू होती. मात्र विरोधी गटातील संस्थापक पॅनलच्या वतीने कारखान्याचे नेते अविनाश मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यात मनोमिलन न होता अविनाश मोहितेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या अशातच तिसऱ्या दिवशी निवडणुकीसाठी माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्व्जीत कदम यांचे चुलते रघुनाथ श्रीपती कदम, विद्यमान व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्यासह ८४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. Election of Krishna Sahakari Sugar Factory close to Bhosle group and Jayant Patil group
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यी निवडणुक सध्या लागलेली आहे. या निवडणुकीत तीन पॅनेल होण्याची दाट शक्यता आहे. अविनाश मोहिते यांनी उमेदवारी अर्ज भारत एकाला चालो चा संदेश दिला. त्यापाठोपाठ मात्र प्रमुख विरोधी पॅनेल असलेल्या संस्थापक पॅनेलचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अविनाश मोहिते यांच्यावर त्यांचेच कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, त्याच कारण असं की वाळवा तालुक्यातील जयंत पाटील साहेबांचे काही प्रमुख कार्यकर्ते हे अविनाश मोहितेंच्या संस्थापक पॅनेलचे स्थापनेपासून कार्यरत आहेत अशात गत इलेक्शनला काही जयंत समर्थकांना अविनाश मोहितेंनी उमेदवारी देताना विचार न करता टिकीट कट केले परंतु सर्व कार्यकर्ते निष्ठापूर्वक राहिले सत्ता नसताना सुद्धा पाच वर्षे त्यांची साथ या सर्वांनी दिली पण या ही वेळी हाच अन्याय झाल्याने या सर्व पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त करून काल सर्वांची बैठक घेऊन दोन दिवसांत अविनाश मोहिते बदल अंतिम निर्णय घेण्याच ठरवलं आहे, या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये जयंत पाटील साहेबांच्या तालुका स्तरावरील प्रमुख नेते व संस्थांचे संचालक यांचाही समावेश आहे यामुळे संस्थापक पॅनेलला वाळवा तालुक्यातूनच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अशात भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय अशी चर्चा सुरू आहे
सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांनी मात्र अर्ज भरण्याच्या बाबतीत कमालीची शांतता बाळगली आहे. सत्ताधारी गट विरोधी गटांमध्ये होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे आणि त्यामुळेच त्यांनी अजून आपले पत्ते उघडले नाहीत. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरत सत्ताधारी सुरेश भोसले गटाने आघाडी घेतली हाती मात्र त्यानंतर त्यांनी सावध पाऊल उचलले आहे. सत्ताधारी गटाकडून सोमवारी अथवा शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी अर्ज दाखल करण्यात येतील मिळाली आहे.