मुंबई : युक्रेन रशिया युद्धाला आज पाच दिवस उलटले आहेत. तरीही युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. युक्रेनमध्ये हजारो विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचं आवाहन केले आहे. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना खोचक टोला लगावला आहे.
आर्यन खानला दिलासा; चौकशी समितीकडून आली सर्वात महत्त्वाची माहिती
अतुल भातखळकर यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, राज्याबाहेर काही घडले की या बापलेकीना कंठ फुटतो. एरव्ही राज्यात सुमारे १०० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यात लूट सुरू आहे. महिला अत्याचार होत आहेत. तेव्हा दोघे बहुधा एफएमवर गाणी ऐकत बसलेले असतात.
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे गोत्यात येणार? ड्रग्झ सापडले नसल्याचा एसआयटीचा अहवाल
खासदार सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं होतं की, केंद्र सरकारने प्रसिद्धीच्या मागे न जाता, आपली पोरं वाचवा. एकदा आटली पोरं मायदेशात परतली की काय प्रसिद्धी करायची ती करा. ही परिस्थिती प्रसिद्धी आणि राजकारण करण्याची वेळ नाही असं त्यांनी म्हटलं होतं. आपरेशन गंगा द्वारे आतापर्यंत हजारांहुन विद्यार्थ्यांना विमानाद्वारे भारतात आणलं आहे. अजूनही कित्येक विद्यार्थी त्याचठिकाणी अडकून पडले आहेत. अशातच आता एका भारतीय विद्यार्थ्यांला रशिया युक्रेन युद्धात प्राण गमावावे लागले आहे. त्यावरूनही विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Read also:
- बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे…; फडणवीसांचा अधिवेशनापूर्वी सरकारला इशारा
- ठाकरे सरकारनं दाऊदला सिंपथी ठेवणारे लोक ठेवलेत, आम्ही चहापानाला जाणार नाही – देवेंद्र फडणवीस
- ठाकरे सरकार, संजय राऊतांचे कपडे उतरावयचे होते, म्हणून नीलला अर्ज करायला लावला – किरीट सोमय्या
- कितीही गोंधळ घाला, नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी विरोधकांना ठणकावलं
- नवाब मलिकांच्या वेळी जे केले, तेच आताही करणार; प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी राष्ट्रवादी मैदानात