नाशिक : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भरगच्च कार्यक्रम हाती घेतला. त्याआधी देखील सेनेविरोधात बंड केल्यानंतर जवळपास 8 दिवस एकनाथ शिंदे हे मोठ्या प्रमाणात व्यस्त होते. त्याचाच परिणाम आज त्यांना जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांची तब्बेत बिघडली असून त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांना दिला आहे. त्यामुळे आज दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“स्वत:वर 307 केस पडली तेव्हा यांची कडी पातळ झाली”; राऊतांवर नितेश राणेंचा प्रहार
ते म्हणाले की, आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून घरी सक्तीच्या आरामासाठी ते घरी बसले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी अंतर्गत कलह अटळ असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला आहे. त्याचबरोबर संघराज्यामध्ये राज्यपालांचा सहभाग महत्त्वाचा व राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असे घटना तज्ञांचे मत असले तरी महाराष्ट्राच्या राज्यपालांना संघराज्य म्हणजे “रेशीमबाग” असेच वाटत असावे,म्हणून ते संघाला पोषक असे वागतात. राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायला वेळ काढावा. असं म्हणत त्यांनी राज्यपालांनावर देखील निशाणा साधला आहे.
मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही; काॅंग्रेसचा उद्या जेलभरो आंदोलन
एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात 20 जुन रोजी बंड पुकारला. त्यानंतर ते सुरत-गुवाहाटी आणि गोवा असे त्यांचे मार्गक्रमण सुरू होते. त्यानंतर ते महाराष्ट्रात आले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी तसेच इतर कार्यक्रमासाठी ते सतत दिल्लीला जात असत. त्याच दरम्यान त्यांनी गडचिरोली याठिकाणी पुरग्रस्त शेतीची पाहणी देखील केली. तसेच नंतर मग त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला.
आता कसं, डॉक्टर म्हणतील तसं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्ब्येत बिघडली
आपल्या राज्यात सध्या दोनच मंत्री कार्यररत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागतात, प्रवास करतात. आपल्याला पण देह आहे. त्याची परिसीमा आहे. त्यामुळे थोडातरी पॉझ हा घ्यावाच लागतो, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते नाशिक मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. संजय राऊतांवरील इडीची कारवाई, मंत्रिमंडळ विस्तार, महापालिकेची प्रभागरचना अशा अनेक विषयांवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे.
Read also
- संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
- संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
- “मंत्रिमंडळ विस्तार प्रश्न गरजेचा नाही, पण शिवसेना प्रहारमध्ये विलीन करू नका”
- “मविआ सरकारचे निर्णय का बदलले? कोर्टात तरी खरं सांगा”; राष्ट्रवादीचा शिंदेंना सवाल
- “मुख्यमंत्री रात्री दोन वाजेपर्यंत जागतात, प्रवास करतात, थोडा वेळ तरी थांबा”