मुंबई : राज्यातील सर्वच भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारून आता २१ पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी झालेला आहे. तरी पंचनामे करण्यासाठी सरकारने अजून कोणतीही कारवाई सुरू केलेली नाही. कोरडा दुष्काळ सदृश स्थिती राज्यातील काही भागात निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत पीकविमा भरपाईची तरतूद आहे. मात्र शेतकर्यांकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्याची टिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…शिंदे अन् फडणवीसांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच वाजलं, लोकसभेच्या या जागेसाठी जोरदार रस्सीखेच
स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्याने पिकवलेल्या उत्पादनावर निर्यात शुल्क लावण्याचा कारनामा मोदी सरकारने करून दाखवला आहे. खरंतर, राज्यात शेतकर्यांकडे ५० लाख टन कांदा पडून आहे. यापैकी केवळ दोन लाख टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटल भावाने सरकार खरेदी करणार आहे. मग, राहिलेल्या कांद्याला कोणता भाव मिळणार? श्रेयवादाच्या लढाईत आघाडी घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान वरून २ लाख टन कांदा खरेदीचा निर्णय जाहीर केला. शिल्लक राहिलेल्या ४८ लाख टन कांद्याबाबत त्यांनी कोणतेही आश्वासन शेतकऱ्यांना दिलेले नाही. एकूणच काय तर केंद्र सरकारच्या जुलमी निर्णयांमुळे आणि ट्रीपल इंजिन सरकारमधील तीनही पक्षात सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत, राज्यातील शेतकऱ्यांचं मरण होतोय ही सत्य परिस्थिती आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“मोदी 2024 ला पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणारच नाही”
दरम्यान, राज्यात शेतकर्यांकडे ५० लाख टन कांदा पडून आहे. यापैकी केंद्र सरकार केवळ दोन लाख टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करणार आहे. मग, राहिलेल्या कांद्याला कोणता भाव मिळणार? राहिलेला कांदा मातीमोल भावाने विकला जाईल. गरज नसताना केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लादून शेतकर्यांच्या पदरात पडणारे दोन पैसे हिरावून घेतले आहेत. सरकारला कांदा उत्पादकांची खरोखर काळजी वाटत असेल, तर निर्यात शुल्क मागे घेतले गेले पाहिजे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचं नाफेडच्या अधिकाऱ्यांना पत्र, कांदा प्रश्नी केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“भारतीय कुस्ती खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत,” UWW ची मोठी कारवाई, अमोल कोल्हे संतापले
हेही वाचा…“शरद पवारांनी मैदान मारलं, पण अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्यु्त्तर”, वाचा सविस्तर
हेही वाचा…“नार्वेकर चुकीचा निर्णय देऊ शकत नाहीत” , शिवसेनेचे १६ आमदार पात्र की अपात्र होणार ?