सुशांत सिंह प्रकरणाचा वापर एखादा पक्ष राजकीय हत्यार म्हणून तर करणार नाही ना अशी शंका सरकारी वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे.याच पार्श्वभूमीवर एक मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना निकम यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला.
गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह प्रकरणाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत मात्र तपासात सत्य समोर येईल असे निकम यावेळी म्हणाले. तसेच बिहार पोलिस डीजीपी पांडे यांनी ज्याप्रकारे हावभाव करून संशयाची सुई फिरवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांना यश आल्याचा टोला देखील उज्वल निकम यांनी यावेळी लगावला.
तसेच या आधी ज्या ठिकाणी गुन्हा झालेला आहे तेथील पोलीस तपास करत असत आता मात्र फिर्याद कोठेही झाली तरी एका राज्यातील पोलीस दुसऱ्या राज्यात जाऊन तपास करतील. मात्र असे होताना राज्यात आणि केंद्रात जर सरकार वेग वेगळे असेल तर एखाद्या पक्षाकडून अशा प्रकरणांचा वापर हत्यार म्हणून इतर पक्षांवर दबाव टाकण्यासाठी होईल अशी देखील शक्यता नाकारता येत नाही मात्र मला त्यात जायचे नाही मी या प्रकरणाकडे कायद्याचा विद्यार्थी म्हणून पाहतो असे मत उज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले नेमकं उज्वल निकम यावेळी
अनेकांनी नको त्या शंका उपस्थित केल्याने सुशांत सिंहचा खून झाला असल्याची भावना जनमानसात तयार झाली.
बिहारचे पोलीस महासंचालकाने याबाबत मीडियामध्ये येऊन मुलाखतींचा सपाट लावला.
बिहारचे पोलीस संशयाची सुई जोरात फिरवण्यात यशस्वी झाले
न्यायालयाच्या निकालाचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी होण्याची भीती.
महाराष्ट्र सरकारी मधील अधिकाऱ्यांनी बिहार पोलीस आरोप करताना त्यांना फेटाळून का लावले नाही ?
न्यायालयाने निकाल देताना मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यास सांगितलं. तसंच सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं यावेळी म्हटलं.