मुंबई : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांपेक्षा अधिक काळाहून संप सुरु आहे. सरकारने काही प्रमाणात सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनवाढ करुन दिली. त्यानंतर काही कर्मचारी पुन्हा रुजु झाले. मात्र बरेचसे कामगार हे अजूनही विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. या विलीनीकरणाचं घोंगडं अजूनही भिजतचं आहेच.
तोंड दाबलेलं, हात पकडलेले; अशा अवस्थेत अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात
या मुद्द्यावर अजून कोणता तोडगा न निघाल्याने कर्मचारी, त्यांच्या कुटूंबीयांनी आणि श्रमिक संघटनांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या कुटूबीयांनी सहभागी घेत आपल्या व्यथा मांडल्या. एसटी संपाला आजपर्यंत पाठिंबा दिला. आता मात्र आम्ही सुद्धा संपात उतरून कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी दिला.
संभाजीराजेंचा पुन्हा एल्गार; ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण
मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विलीनीकरणाचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मांडण्यासाठी आणखी 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारला 18 फेब्रुवारीला हा अहवाल सादर करायचा आहे. राज्य सरकारने या अहवालासाठी मुदतवाढ देण्यात यावी, असा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात केला होता. त्यानुसार सरकारने ही मुदतवाढ दिली. याआधी 12 आठवड्यांची देण्यात आली मुदत ही याआधीच संपलेली असल्याने हा वाढीव वेळ देण्यात आला.
Read also:
- “महाराष्ट्रात दोन शिवजयंती नको”; शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- शिवसेना-भाजपची पुन्हा युती; ‘या’ नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला शिकवला धडा
- पुण्यातील लोकांना माहित आहे… अजित पवारांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी हाणला उपरोधिक टोला
- शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी; काय आहेत नियम… वाचा सविस्तर…
- चर्चा तर होणारच.! राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदुह्रदयसम्राच, घाटकोपरमध्ये भलमोठं बॅनर