कोल्हापूर : खासदार छत्रपती संभाजीराजे यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी मोठी भूमिका जाहीर केली आहे. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं संभाजीराजे यांनी जाहीर केलं आहे.
शाहू महाराज यांनी सर्व जातीला आरक्षण दिलं. मराठा समाज सुद्धा बहुजन समाजाचा घटक आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचं संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.
संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चाची बिले दिली कोणी? किरीट सोमय्यांचा संतप्त सवाल
मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार आहे. आझाद मैदानावर एकटा आमरण उपोषण करणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणचे 5 मुद्दे मान्य केले पाहिजे. मराठा आरक्षणामध्ये आंदोलन करणारे लोकावरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी समाज का ठरवू शकत नाही? जितेंद्र आव्हाड
मी उद्विग्न झालो आहे. आमचा एवढीच मागणी आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आरक्षण रद्द वर चर्चा केली. माझा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. पूर्णविचार याचिका मध्ये सरकारने वेळकाढूपणा केला आहे. भोसले समितीची शिफारसची माहिती नाही. जो पर्यंत सामाजिक मागास सिद्ध होती नाही तोपर्यंत मराठाला आरक्षण मिळणार नाही. 8 महिन्यांपासून सरकार समिती स्थापन वर काहीही बोलत नाही, असं संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
तुम्हाला आंदोलन करता येणार नाही; नाना पटोलेंना पोलिसांनी अडवलं
2007 पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. गेल्या काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. मात्र अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो मात्र आता मी उद्विग्न झालो, असं वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
Read also:
- तोंड दाबलेलं, हात पकडलेले; अशा अवस्थेत अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात
- नाना पटोले नौटंकीबाज, मोदी नव्हे काँग्रेसनेच देशाची माफी मागावी – देवेंद्र फडणवीस
- कोकणात जोरदार राडा; भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
- महाराष्ट्राचे राजकारण हलवून देणारी पत्रकार परिषद उद्या होणार; संजय राऊतांचा भाजपा विरुद्ध एल्गार
- सगळ्यांना माहित आहे की पाठीत खंजीर कोणी खुपसला; देवेंद्र फडणवीसांच आदित्य ठाकरेंना प्रत्यूत्तर